शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

यादीत नसलेल्या कापूस बियाणांचाही जिल्ह्यात सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:50 IST

गतवर्षी बोंडअळीने कपासीचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी चोर बीटी बियाणे कारणीभूत ठरले होते. मागील खरीप हंगामात नुकसानीची तीव्रता पाहून कृषी विभागाने चोर बीटीला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी छापा मारले. तरीही राज्य सरकारने अधिकृत केलेल्या ३७० वाणांच्या यादीत नसलेल्या कापूस बियाणांचा जिल्ह्यात सुळसुळाट आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा धोका : कृषी विभागाने बोगस बियाण्यांवर आळा घालण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी बोंडअळीने कपासीचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी चोर बीटी बियाणे कारणीभूत ठरले होते. मागील खरीप हंगामात नुकसानीची तीव्रता पाहून कृषी विभागाने चोर बीटीला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी छापा मारले. तरीही राज्य सरकारने अधिकृत केलेल्या ३७० वाणांच्या यादीत नसलेल्या कापूस बियाणांचा जिल्ह्यात सुळसुळाट आहे. यामध्ये गुजरातमधून आलेले बियाणेही माथी मारले जात आहे. यावर आळा घातला नाही, तर या हंगामात मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार आहेत. मागील वर्षी बोंडअळीने हैदोस घातल्याने शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना या पाच तालुक्यांमध्ये शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी विभागाच्या बियाणे गुणवत्ता तपासणी पथकाने अनेक ठिकाणी छापे मारुन बियाणे जप्त केले. अवैध विके्रत्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु गुजरातमधून आलेले कापूस बियाणे कृषी विभागाला जप्त करण्यास अद्याप यश आले नाही. कृषी निविष्ठा विकणाºया काही दुकानदारांनी गुजरातेतील व्यापाºयांशी संगणमत करुन हे बियाणे जिल्ह्यात आणले. एजंटाच्या माध्यमातून शेतकºयांना गाठून माथी मारल्या जात आहे.गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर व पोडसा परिसरातील काही शेतकºयांनी एजंटमार्फत हे बियाणे विकत घेतले होते. मात्र पिकांचे नुकसान होणार अशी माहिती मिळताच त्यांनी बियाणे परत केले. दरम्यान त्या एजंटानी या शेतकºयांचे काही पैसे कपात केल्याचाही प्रकार घडला. पण, पोलीस अथवा कृषी विभागापर्यंत या घटनेची तक्रार करण्यात आली नाही. याचा अर्थ जिल्ह्यातील कापूस उत्पादक तालुक्यामधून जाळे पसरवून शेतकºयांना बोगस बियाणे विकले जात आहे. सध्या पेरणीकरिता पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. काही शेतकºयांनी धोका पत्करून पेरणी केली. पण, बियाणे उगवले नाही. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यास पेरणीला वेग येऊ शकते. शेतकºयांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने बोगस बियाण्यांचे रॅकेट शोधून तातडीने बंदोबस्त करावी, अशी मागणी आहे.बियाणे खरेदी करताना काळजी घ्याखरेदी करावयाच्या बियाण्यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का हे सर्वप्रथम जाणून घ्यावे. निवडलेले वाण व कालावधीचा याची माहिती घ्यावी. आहे. वैशिष्ट कोणती, बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेत्यांवर पूर्ण विश्वास ठेवू नये. कंपन्याच्या जाहिराती वाचून खरेदी करु नये. बियाणे अभ्यासपूर्वक खरेदी करावे. भाजीपाला बियाण्यांच्या बाबतीत हंगाम व खताच्या शिफारशी, याची माहिती घेतल्याशिवाय खरेदी करणे चुकीचे आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. परिसरातील हवामान, पावसाचे प्रमाण तसेच कोणत्या कालावधीपर्यंत लागवड करायची याची माहिती घ्यावी. शिफारस केलेला लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर बियाण्यांची लागवड करुन नये. बियाणे खरेदीच्या बिलावर पावतीवर विक्रेत्या व शेतकऱ्याची सही असणे आवश्यक आहे. बियाण्यांच्या पिशवीवरील किंमतीपेक्षा जास्त भावाने बियाणे खरेदी करु नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहेत त्या किंमतीपेक्षा दुकानदार जास्त पैसे मागितल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. छापलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणे गुन्हा असून त्याविषय गप्प न राहता नियमानुसार तक्रार दाखल करण्याचे कळविण्यात आले आहे.