शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

कापूस उत्पादक कर्जाच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2015 01:36 IST

सन २०१३ मध्ये डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात भाजपाच्या नेतृत्वात ‘देता की जाता’ या शीर्षकाखाली विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता.

युती सरकारला आश्वासनांचा विसरवनसडी : सन २०१३ मध्ये डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात भाजपाच्या नेतृत्वात ‘देता की जाता’ या शीर्षकाखाली विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता. हजारो शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी होऊन आपल्या मालाला योग्य भाव मिळावे म्हणून आशावादी होते. सरकार बदलले आणि आता सरकारला धारेवर धरणारे नेते सत्ताधारी पक्षात आहेत. पण शेतकऱ्यांची अवस्था मात्र जैसे थे असल्याने कापसाला मिळणारा हमीभाव अत्यल्प आहे. आघाडी सरकारच्या काळात मोर्चाचे नेतृत्व राज्याचे विद्यमान अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या मोर्चात अनेक मोठे भाजप नेतेही सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देण्याचे निवेदन सरकारला दिले. पण त्यांच्या निवेदनाचा परिणाम आघाडी सरकारवर झाला नाही. कापसाला प्रति क्विंटल चार हजार रुपये होता. याहीवेळी बळीराजाची निराशा झाली आहे.२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला सरकारच्या विरोधात शेतकरी व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याचा मुद्दा सापडला व त्यांचा प्रचारही याच मुद्दयांवर गाजत होता. परिणामी त्यांचा हेतु सफल झाला आणि त्यांना सत्ता हस्तगत करता आली. तब्बल २० वर्षानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. त्यामुळे शेतकरी बंधुनी सुटकेच्या श्वास सोडला. आता आपल्यासाठी ‘अच्छे दिन’ येणारच याची चाहुल वाटून ते आनंदात होते. पण जेव्हा मात्र मालाला कवडीमोल भाव मिळू लागला, तेव्हा मात्र शेतकऱ्यांचा भ्रम दूर झाला व त्यांना ‘जुने ते सोने’ हेच आठवू लागले.प्रचारामध्ये कापसाला हमी भाव पाच ते सहार हजार रुपये देतो म्हणणारे सरकार यांनी फक्त ५० रुपये हमी भाव वाढवून दिला. आपल्या संकट काळात शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन गोळी मारणारे नेते आता शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडून त्यांना फक्त आश्वासनाची खैरात वाटताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधुंना अच्छे दिन कधी येईल याची सध्यातरी प्रतीक्षा लागली आहे.हजारो शेतकरी बांधवांना सोबत घेऊन स्वत: ची पोळी भाजणारे काही नेते आता ‘काम झाले माझे, काय करु तुझे’ या उक्तीप्रमाणेच वागताना दिसत आहेत. शेतकरी बांधवाच्या कापसाला किमान प्रति क्विंटल पाच ते सहा हजार रुपये भाव मिळावा तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज फेडता येईल. कापूस वेचणीलाच ७०० ते ८०० रुपये खर्च येतो आणि मिळणारा भाव हा तीन ते साडेतीन हजार रूपये आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. (वार्ताहर)