शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी

वरोरा : कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी सात हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजारात आला. यावर्षात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वरोरा बाजारपेठेत आल्याने मागील अनेक वर्षांपासून वरोरा कापसाची बाजारपेठ मागे पडली. आता वरोरा कापूस बाजारपेठेला चांगले दिवस आल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे इतरही व्यवसाय तेजीत आल्याचे मानले जात आहे.मागील काही दशकात वरोरा ही कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. वरोरा शहरात चार, माढेळी, शेगाव येथे जिनिंग फॅक्टरी होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला होता. परंतु आधुनिकीकरणात या सर्वच जिनिंग फॅक्टरी बंद पडल्या. त्या जागेवर निवासस्थाने झाल्याने अनेक कुटुंबाचे रोजगार हिसकाविल्या गेला. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कापसाची वरोरा येथील बाजारपेठ नामशेष झाली होती. त्यामुळे वरोरा शहरातील इतर व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसला.सध्या वरोरा शहरात दोन व माढेळी येथे एक जिनिंग खाजगीरित्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी वरोरा परिसरातील कापूस व्यापारपेठेकडे वळले आहे. वरोरा परिसरात जिनिंग सुरू झाल्याने कापसाच्या पेऱ्यातही मागील काही वर्षात वाढ झाली आहे. शासनाने यावर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला आहे. हा भाव कमी असला तरी कापूस उत्पादकांना आता पर्याय नाही. या भागात उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने कापसाला भाव वाढ मिळेल किंवा बोनस मिळेल या आशेने शेतकरी आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यासारखे आहे. कापूस दर वाढीची घोषणा होईल या आशेवर कापूस उत्पादक आहे. अनेकांनी कापूस मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवला. अधिक दिवस झाल्यास कापसाची प्रतवारी खराब होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापूस विकायला सुरूवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत कापसाची आवक वाढली आहे. १९ डिसेंबरला ७ हजार क्विंटल कापूस व्यापारपेठेत आला असल्याने ही आवक विक्रमी मानली जात आहे. मागील कित्येक वर्षात वरोरा परिसरातील कापसाच्या व्यापारपेठेवर आलेली मरगळ आता दूर होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस गाठीला मागणी नसल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)