शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी

वरोरा : कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी सात हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजारात आला. यावर्षात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वरोरा बाजारपेठेत आल्याने मागील अनेक वर्षांपासून वरोरा कापसाची बाजारपेठ मागे पडली. आता वरोरा कापूस बाजारपेठेला चांगले दिवस आल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे इतरही व्यवसाय तेजीत आल्याचे मानले जात आहे.मागील काही दशकात वरोरा ही कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. वरोरा शहरात चार, माढेळी, शेगाव येथे जिनिंग फॅक्टरी होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला होता. परंतु आधुनिकीकरणात या सर्वच जिनिंग फॅक्टरी बंद पडल्या. त्या जागेवर निवासस्थाने झाल्याने अनेक कुटुंबाचे रोजगार हिसकाविल्या गेला. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कापसाची वरोरा येथील बाजारपेठ नामशेष झाली होती. त्यामुळे वरोरा शहरातील इतर व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसला.सध्या वरोरा शहरात दोन व माढेळी येथे एक जिनिंग खाजगीरित्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी वरोरा परिसरातील कापूस व्यापारपेठेकडे वळले आहे. वरोरा परिसरात जिनिंग सुरू झाल्याने कापसाच्या पेऱ्यातही मागील काही वर्षात वाढ झाली आहे. शासनाने यावर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला आहे. हा भाव कमी असला तरी कापूस उत्पादकांना आता पर्याय नाही. या भागात उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने कापसाला भाव वाढ मिळेल किंवा बोनस मिळेल या आशेने शेतकरी आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यासारखे आहे. कापूस दर वाढीची घोषणा होईल या आशेवर कापूस उत्पादक आहे. अनेकांनी कापूस मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवला. अधिक दिवस झाल्यास कापसाची प्रतवारी खराब होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापूस विकायला सुरूवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत कापसाची आवक वाढली आहे. १९ डिसेंबरला ७ हजार क्विंटल कापूस व्यापारपेठेत आला असल्याने ही आवक विक्रमी मानली जात आहे. मागील कित्येक वर्षात वरोरा परिसरातील कापसाच्या व्यापारपेठेवर आलेली मरगळ आता दूर होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस गाठीला मागणी नसल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)