शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बाजार समित्यांत कापसाची आवक वाढली

By admin | Updated: November 7, 2016 01:24 IST

खरीप हंगामाच्या पूर्वी मशागतीपासून सातत्याने शेतात पैसे ओतणारा शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पीक हातात येत आहे.

दरामुळे शेतकरी चिंतेतच : जिल्ह्यात तीन ठिकाणी कापूस खरेदीचंद्रपूर : खरीप हंगामाच्या पूर्वी मशागतीपासून सातत्याने शेतात पैसे ओतणारा शेतकरी आता प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पीक हातात येत आहे. मात्र भाव पटण्याजोगा नाही. तरीही आर्थिक विवंचनेतून कापूस उत्पादन कापूस विकायला काढत आहे. याचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनीही कापूस खरेदीचा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात राजुरा, वरोरा, माढेळी या ठिकाणी बाजार समितींच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू असून समित्यात कापसाची आवक वाढू लागली आहे. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतकऱ्यांना चिंतेतच टाकून गेला. प्रारंभी पाऊस व्यवस्थित पडल्यानंतर पुढे पावसाने दडी मारली. अनेक दिवस पावसाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अधिकचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. त्यानंतर कसेबसे पीक वाचल्यानंतर वातावरणाच्या बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली. यातही शेतकऱ्यांनी पुन्हा पैसा खर्च करावा लागला. एवढे करूनही ऐन पीक हाती येत असताना परतीच्या पावसाने कहर केला. यात पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता जे पीक आहे, ते विकतो म्हटले तर पिकांना भाव नाही. कापसाबाबत अशीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र पैशाची गरज असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. वरोरा, माढेळी, राजुरा या ठिकाणी बाजार समित्यांच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वरोरा येथील रवी कमल कॉटेक्स व माढेळी येथील पारस कॉटनमध्ये ५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. कापूस खरेदीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विशाल बदखल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, संचालक किशोर भलमे, देवानंद मोरे, राजू आसुटकर, हरिदास जाधव, बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, सहा सचिव सचिन डहाळकर, लेखापाल किशोर महाजन, निरीक्षक कन्हैया वरुटकर आदी कर्मचारी उपस्थित होते. कापूस ठेवून येणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रविकमल काटेक्समध्ये प्रति क्विंटल ४७२५ रुपये तर पारस कॉटन माढेळी येथे प्रति क्विंटल ४७०७ रुपये दर देण्यात आला. रविकमल कॉटेक्समध्ये पहिल्या दिवशी ५९० क्विंटल तर पारस कॉटन येथे ८६० क्विंटल कापसाची आवक झाली. यासोबतच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार मुर्सा येथील केंद्रावरही कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आलेली आहे. कापसाला ४६५० ते ४७४१ रु. प्रति क्वि. भाव देण्यात आला. येथे आतापर्यंत २५ गाड्याची आवक झालेली आहे. बाजार समितीचे सभापती वासुदेव ह. ठाकरे यांनी पहिल्या बैलगाडीचे शेतकरी शंकर भाऊराव देहारकर रा. घोनाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच सदर कार्यक्रमाला उपस्थित बाजार समितीचे सदस्यांनी शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. विशेष म्हणजे, कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार होत असला तरी शेतकरी मात्र मिळणाऱ्या अल्प दरामुळे नाखूश असल्याचे दिसून येत आहे. कापसाचा दर पटण्याजोगा नाही; तरीही पैशाच्या गरजेपोटी नाईलाजाने त्यांना आपला कापूस विक्रीसाठी काढावा लागत आहे. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)सहा हजारांहून अधिक दर हवाशेतीच्या मशागतीपासून पीक हाती येईलपर्यंतचा लागवडी खर्च विचारात घेतला तर शेतकऱ्यांना कापसाला सहा हजारांहून अधिक दर हवा आहे. शासनाने अद्यापही शासकीय दर घोषित केलेला नाही. व्यापारी वाट्टेल तसा दर देऊन विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.दिवाळी अंधारातकापसाला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती येऊनही विक्रीसाठी काढले नाही. आज ना उद्या भाव वाढेल, याची प्रतीक्षा करीत असतानाच दिवाळी आली. कापूस विकला नाही म्हणून पैसेही आले नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.