शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

कपाशी व मिरचीचे उभे पीक करपले

By admin | Updated: October 16, 2015 01:36 IST

दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे.

गोवरी : दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे. मेहनतीने जोपासना केलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतातील पीक फळधारणेवर आले असताना धुव्वाधार पावसाने शेतातील कपाशीची व मिरचीची पिके भूईसपाट झाली.उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र पावसाने शेतातील पिकांची पूर्णत: वाट लावून टाकली आहे. पावसानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची पिके वाळली आहे तर मिरचीची पिके तुटून पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हरदोना (खुर्द) येथील अरविंद गोविंदा ढवळे यांचे चार एकरातील कपाशीचे उभे पिक वाळले आहे तर राजुरा तालुक्यातील गोवरी येथील गणपत जुनघरी, अरुण भलमे, भास्कर जुनघरी, अमित रणदिवे, नामदेव देवाळकर, बंडू जुनघरी, रामदास देवाळकर, विकास पिंपळकर, नथ्थू पिंपळकर, संतोष जुनघरी, प्रभाकर जुनघरी तर पेल्लोरा येथील साईनाथ जुनघरी यांच्या शेतातील मिरचीचे व कपाशीचे पिक वाळत चालले आहे.अतोनात खर्च करून हाती आलेले पिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हादरला आहे. डवरणी, निंदन व रासायानिक खते देऊन पिके वाढविली. मात्र अचानक आलेल्या संततधार पावसाने पिकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे आडवे झालेले पिक शेतकरी मजूर लावून उभे करीत आहे. एवढ्या मोठ्या शेतातील कपाशीचे पिक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. त्याकामी मजूर लावणेही शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. परंतु शेतातील उभे पिक पावसाने पूर्णत: आडवी झाल्याने शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय उरला नाही. पावसामुळे झाडाच्या मुळाजवळील माती वाहून गेल्याने झाडात उभे राहण्याची क्षमता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चावर पाणी फेरले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी पुरता हादरून गेला आहे. अतोनात खर्च करून पिक हाती येण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. (वार्ताहर)