शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

घरकूल योजनेतून कोठारीला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:13 IST

बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यात केवळ ६० रमाई घरकूल : सरपंच, सदस्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

आॅनलाईन लोकमतकोठारी: बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. हा अन्याय दूर केला नाही तर आंदोलन करू, असा इशारा सरपंच मोरेश्वर लोहे व ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.सन २०१७-१८ या वर्षाकरिता कोठारी ग्रा. पं कडून रमाई घरकूल योजनेचे प्रस्ताव मागविले होते. ग्रा.पं. ने ठराव घेवून २५२ लाभार्थ्यांची यादी १ जानेवारी २०१८ ला पं.स.कडे पाठविण्यात आली. पंचायात समितीने प्राप्त यादीतील साठ घरकुलांना मंजुरी दिली. मंजूर गावांच्या यादीत कोठारीला वगळण्यात आले. अनुसूचित जातीतील एकाही लाभार्थ्यांला घरकूल यादीत स्थान मिळाले नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र नागरिक घरकूलसाठी प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर वंचित ठेवले, असा आरोप पात्र नागरिकांनी केला आहे.रमाई घरकुलचा लाभ घेण्यासाठी शासनाने निकष तयार केले आहेत. या निकषात कोठारी येथील अनुसूचित जातीचे नागरिक पात्र ठरतात. या सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. स्वबळावर घर बांधू शकत नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून घर मिळेल, याकडे त्यांचे लक्ष होते. यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व पुरावे सादर केले. ग्रामसभा घेवून ठरावही पारीत करण्यात आला. हा ठराव पंचायत समितीला सादर केल्यानंतर संबंधित अधिकाºयांनी बल्लारपूर तालुक्यासाठी केवळ ६० घरकूल मंजूर केले. चुकीच्या मानसिकतेमुळे कोठारी येथील पात्र नागरिकांवर अन्याय झाला आहे. या घटनेची चौकशी करून पात्र नागरिकांना घरकूल मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षताबल्लारपूर पं.स. अंतर्गत रमाई घरकूल योजनेच्या लाभापासून कोठारी येथील गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले. पंचायत समितीने निकषांचे पालन केले नाही. ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पंचायत समितीने त्रुटी कळविली असती तर दूर करता आली असती. पण, यासंदर्भात ग्रामपंचायतला काहीही कळविण्यात आले नाही. त्यामुळे अर्ज सादर करणाºया नागरिकांचा हिरमोड झाला आहे. या अन्यायाविरुद्धात पंचायत समितीसमोर पात्र नागरिकांसह बेमुद उपोषण करू, असा इशारा सरपंच मोरेश्वर लोहे व ग्रा. पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.