शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात मनपाची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

ठळक मुद्देएकाच दिवशी १२४ लोकांवर कारवाई : २४ हजार ८०० रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी यासंबंधीचे निर्देश दिले असून त्यानुसार चंद्रपुरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकारण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकांनी बुधवारी व गुरुवारी शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या १२४ नागरिकांवर कारवाई करीत २४ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे.त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणाºयांना २०० रुपये दंड लावण्याची कारवाई सुरु केलेली आहे.याची अंमलबजावणी महानगरपालिकेने सुरू केली आहे. प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे बुधवारी ४२ नागरिकांवर कारवाई करून आठ हजार ४०० रुपये दंड व गुरुवारी ८२ नागरिकांवर कारवाई करून १६ हजार ४०० रूपयांचा दंड असे दोन दिवसात एकूण १२४ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण २४ हजार ८०० रुपयांचा दंड पथकांनी वसूल केला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.झोननिहाय कारवाईझोननिहाय कारवाईदरम्यान झोन क्र.१ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपये दंड, झोन क्र. २ अंतर्गत ४२ लोकांवर कारवाई करून ८४०० रुपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला ३ मॉस्कसुद्धा देण्यात आले.गडचांदुरात तीन दिवसात ८४५ जणांवर कारवाईगडचांदूर नगर परिषदेच्या वतीने तीन दिवसात ८४५ नागरिकांवर मास्क न लावता फिरत असताना कारवाई केली. प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला. सदर कारवाई नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक स्वप्नील पिदूरकर, स्वच्छता निरीक्षक प्रमोद वाघमारे, संतोष गोरे, संतोष करदोडे, साहील कुलसंगे, सचिन खनके यांनी केली.प्रभागनिहाय तीन पथकेसहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात तीनही झोनच्या स्वच्छता निरीक्षकांद्वारेही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात एक असे तीन पथक तैनात केले आहेत. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मॉस्क लावून ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या