शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

‘श्री’च्या उत्सवासाठी मनपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:40 IST

मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत.

ठळक मुद्देमूर्तिकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २ सप्टेबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड, रस्त्यांची डागडुजी आदी कामे पूर्ण केली आहेत. दरम्यान, या उत्सवात जल व ध्वनी प्रदूषण होऊ नये, शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मूर्तीकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची एक बैठक घेत त्यांना मनपा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.याप्रसंगी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर आॅफ पॅरिस निर्मित मूर्ती संबंधाने उपाययोजना करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, मंडप उभारणे, सजावट करणे, मूर्ती विसर्जनासंबंधी मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली.मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले. यावेळी महानगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करामागील वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरातील ९० टक्क्यांपेक्षा ज्यास्त मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले होते. यंदा १०० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. पाच ते साडेपाच फुटापर्यंतची मूर्तीसुद्धा आता कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात दर १ ते २ तासांनी विरघळणारी माती बाहेर काढण्यात येते. त्यामुळे मोठया मूर्तींचे विसर्जन योग्यप्रकारे होण्यास अडचण निर्माण होत नाही. याकरिता कृत्रिम तलावांची उंची वाढविण्यात आलेली आहे. कृत्रिम तलाव वापरास प्रोत्साहन म्हणून मनपातर्फे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येते. मागील वर्षी १९ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यावर्षी आवश्यकतेनुसार अधिक तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.देखाव्यात प्लास्टिक, थर्माकॉल टाळावेमंडळांनी गणेश सजावट व देखावे तयार करताना प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर टाळावा. गणेशोत्सव काळात प्लस्टिकचा कचरा तयार होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. पर्यारवण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच स्वीकारायला हवी. प्रत्येक घरातून याची दक्षता घेतली गेल्यास इको प्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हायला मदत होईल.स्वस्त दरात वीज पुरवठागणेश मंडळांनी स्थापनेसाठी मनपाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरातील गणेश मंडळांनी विद्युत खांबावरून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घेऊ नये. विद्युत जोडणीसाठी स्वस्त दरात तात्पुरते वीज कनेक्शन महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिले जात आहे. गणेश मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019