शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री’च्या उत्सवासाठी मनपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:40 IST

मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत.

ठळक मुद्देमूर्तिकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २ सप्टेबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड, रस्त्यांची डागडुजी आदी कामे पूर्ण केली आहेत. दरम्यान, या उत्सवात जल व ध्वनी प्रदूषण होऊ नये, शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मूर्तीकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची एक बैठक घेत त्यांना मनपा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.याप्रसंगी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर आॅफ पॅरिस निर्मित मूर्ती संबंधाने उपाययोजना करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, मंडप उभारणे, सजावट करणे, मूर्ती विसर्जनासंबंधी मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली.मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले. यावेळी महानगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करामागील वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरातील ९० टक्क्यांपेक्षा ज्यास्त मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले होते. यंदा १०० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. पाच ते साडेपाच फुटापर्यंतची मूर्तीसुद्धा आता कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात दर १ ते २ तासांनी विरघळणारी माती बाहेर काढण्यात येते. त्यामुळे मोठया मूर्तींचे विसर्जन योग्यप्रकारे होण्यास अडचण निर्माण होत नाही. याकरिता कृत्रिम तलावांची उंची वाढविण्यात आलेली आहे. कृत्रिम तलाव वापरास प्रोत्साहन म्हणून मनपातर्फे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येते. मागील वर्षी १९ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यावर्षी आवश्यकतेनुसार अधिक तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.देखाव्यात प्लास्टिक, थर्माकॉल टाळावेमंडळांनी गणेश सजावट व देखावे तयार करताना प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर टाळावा. गणेशोत्सव काळात प्लस्टिकचा कचरा तयार होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. पर्यारवण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच स्वीकारायला हवी. प्रत्येक घरातून याची दक्षता घेतली गेल्यास इको प्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हायला मदत होईल.स्वस्त दरात वीज पुरवठागणेश मंडळांनी स्थापनेसाठी मनपाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरातील गणेश मंडळांनी विद्युत खांबावरून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घेऊ नये. विद्युत जोडणीसाठी स्वस्त दरात तात्पुरते वीज कनेक्शन महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिले जात आहे. गणेश मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019