शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST

कोरोनामुळे यंदा शाळा भरल्याच नाही. परिणामी, शेकडो मुले शाळेत दाखल झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० ...

कोरोनामुळे यंदा शाळा भरल्याच नाही. परिणामी, शेकडो मुले शाळेत दाखल झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षक दारोदार फिरत आहेत. या मोहिमेंतर्गत शिक्षकांना वीटभट्टी, रेल्वे फलाट, नवीन वस्त्या, रस्त्याच्या किनाऱ्यावर हंगामी मुक्कामी असलेले कुटुंब, गर्दीची ठिकाणे गाठून ३ ते १८ वर्षांतील शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यायचा आहे. त्यानंतर, त्याच्या वयोमानानुसार त्याला जवळच्या शाळेत प्रवेशित करण्यात येणार आहे, परंतु कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, शिक्षकांना शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यास मोठी अडचण जात आहे, तरीही कोरोनाच्या दहशतीमध्ये शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहे. ७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांनी सुमारे ८९ शाळाबाह्य मुलांचा शोध लावून त्यांना जवळच्या शाळेमध्ये दाखल केले आहे.

बॉक्स

शिक्षकांची होतेय धावपळ

चंद्रपूर जिल्ह्यात परराज्यातून अनेक छोटे-मोठे विक्रेते वस्त्या तयार करून आहेत. अशा वस्त्यांचा शोध घेऊन पालकांना पाल्याला शाळेत पाठविण्याबाबत प्रवृत्त करणे शिक्षकाला मोठे जिकरीचे जात आहे. त्यामुळे शिक्षकांची मोठी धावपड होत आहे. कुटुंबाबाबत विचारपूस केल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवतील, या भीतीने माहिती देण्यास बहुतांश पालक शिक्षकांना टाळाटाळ करीत आहेत.

बॉक्स

बाल कल्याण विभागाचे सहकार्य

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीम शिक्षकांसोबत बाल कल्याण विभागातील मदतनीस, पर्यवेक्षक व कर्मचारी सहकार्य करीत आहेत. ३ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांचा शोध घेण्यात येत आहे. ३ ते ६ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांची नोंद बाल कल्याण विभागाकडे करण्यात येणार आहे.

कोट

२३ मार्चच्या शासन निर्णयानुसार, ३ ते १८ वर्षे वयोगटांतील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम शिक्षकांच्या माध्यमातून, तसेच बाल कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली आहे. ७ मार्चपर्यंत जिल्ह्यात ८९ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्या मुलांना त्यांच्या वयोगटांनुसार जवळच्या शाळेत दाखल केले जाणार आहे.

- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, चंद्रपूर