शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आलेख घसरतोय, मात्र नागरिकांची बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे ...

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक जाहीर केले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू असतात. परंतु, चंद्रपुरातील मुख्य मार्ग व चौकाचौकांत दिवसभर गर्दी असते. अत्यावश्यक कामाच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली. पण, त्यांना अडविणारे कुणी नाही. बसस्थानकापासून तर गांधी चौक, गोल बाजारातील दुकाने, भाजी मार्केट परिसरात वस्तू खरेदी करणारे कमी मात्र विनाकारण गर्दी करणारेच दिसून येत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक असा गैरफायदा घेत असताना चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन व पोलीस गप्प आहेत. कोरोना वाढू नये, म्हणून लागू केलेल्या संचारबंदीला कुणी जुमानत नसल्याचे शहरात चित्र आहे. असाच प्रकार कायम राहिल्यास गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका आहे.

मोबाइल व्हॅनद्वारे करा रॅपिड अँटिजन टेस्ट

काहीही काम नसताना फिरणाऱ्यांची संख्या कोरोना संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकते. यातून आरोग्य यंत्रणेवरील ताण पुन्हा वाढण्याचा धोका आहे. हॉस्पिटलमध्ये आधीच ऑक्सिजन बेड मिळत नाही. रुग्णसंख्या वाढली तर स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अँटिजन टेस्ट करण्याचा आदेश चंद्रपूर मनपा प्रशासनाने जारी करावा, संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास लगेच विलगीकरण कक्षात पाठविण्याची तंबी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

‘त्या’ नागरिकांपासून घ्यावा धडा

चंद्रपूर शहर व अन्य तालुकास्थळी निर्बंध धाब्यावर ठेवण्याचे प्रकार सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र सार्वजनिक खबरदारीचे दर्शन घडवित आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांनाच बसत आहे. शहराच्या तुलनेते पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे. त्यामुळे सरंपच, पोलीस, ग्रामपंचायतींचे सदस्य, महिला व पुरुष बचतगटातील नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे पालन करताना दिसतात. गावात विनाकारण फिरणाऱ्या तरुण मुलांना शेतीच्या कामात हातभार लावण्यास शिवारात घेऊन जात आहेत.

पोलीस यंत्रणा गेली कुठे?

राज्य सरकारने निर्बंध लागू केल्यानंतर नागरिकांकडून उल्लंघन होऊ नये, याकडे लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुमारे तीन हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. चंद्रपुरातही पहिल्या दिवशी नागरिकांची तपासणी करताना पोलीस दिसले. त्यामुळे सुरुवातीला घराबाहेर निघताना पोलीस तपासतील म्हणून मनात धास्ती वाटायची. मात्र, ती आता राहिली नाही, हेच गर्दीवरून जाणवू लागले आहे.