शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कोरोनामुळे महिला बचतगटांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST

शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील महिलांना बचत गटाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले होते. बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता ...

शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील महिलांना बचत गटाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले होते. बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता मिळाल्यास सामाजिक प्रश्न कायमचे सुटू शकतात़ शिवाय लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये आपले न्यायहक्क प्राप्त करण्यासाठी या बचतगटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे शासनाने बचतगट स्थापन करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये बचतगटांची स्थापना झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमाने विविध योजनांची काही प्रमाणात अंमलबजावणी झाल्याने महिलांमध्ये जागृती वाढत आहे. शहरातील विविध प्रभागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बचतगटांची परिस्थिती निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी बचतगट स्थापन केले पण स्वयंरोजगार व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणतर व्यवसाय उभारावा, याबाबत त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

वस्तू विक्रीची व्यवस्थाच नाही

बाबूपेठ, सुमित्रानगर, बालाजी वॉर्ड, तुकूम, भिवापूर तसेच अन्य काही वॉर्डातील महिलांनी गृहोपयोगी वस्तू तयार करण्याचे काम सुरू केले. बचतगटांद्वारे उभारण्यात आलेल्या हा व्यवसाय वाढू शकतो. मात्र, बचतगटांनी तयार केलेल्या मालाला विक्रीची व्यवस्था नाही. त्यामुळे लाखो रूपयांचे साहित्य पडून आहे. व्यवसाय उभारल्यानंतर मालाची विक्री कशी करावी याचे ज्ञान महिलांनी मिळविले. पण पायाभूत सुविधा नसल्याने अडचणी पुढे आल्या. चंद्रपुरात उमेद प्रकल्पाचा विस्तार करण्याची गरज आहे.

बँकांकडून कर्जास नकार

महिला बचतगटांना व्यवसाय उभा करण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही. मनपाने प्रारंभी बँक व बचतगटांमध्ये समन्वयाची भूमिका घेतली होती. परंतु सद्यस्थितीत याकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक महिला बचतगटांना कर्जासाठी नकार देतात. भांडवलच नसेल तर व्यवसाय कसा उभा करावा, असा प्रश्न महिला विचारत आहेत.