शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

रिक्षाचालकांना कोरोनाचा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे ...

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे काम करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामध्ये रिक्षाचालकांचेही मोठे नुकसान होत असून जगण्याचा मोठा प्रश्न त्यांना पडला आह.

कोरोनामुळे प्रत्येकाचे नुकसान होत आहे. मात्रए ज्यांचे हातावर पोट आहे, रोजमजुरी करतात त्यांचे हाल सुरू आहेत. मागील वर्षी हे हाल कसेबसे सोसले. मात्र यावर्षीही लाॅकडाऊन झाल्यामुळे आता त्यांचाही संयम सुटला आहे. मात्र, इलाजच नसल्यामुळे काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना रिकामे रहावे लागत आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

शहरात जवळपास चारशे ते पाचशे हातरिक्षाचालक आहेत. ते विविध साहित्य पोहोचवून मिळालेल्या भाड्यामध्ये गाडीचे भाडे देऊन संसार चालवालचे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कामच नाही. नाही म्हणायला एखाद्याला किराणा सामान नेण्याचे काम मिळत आहे. मात्र, नियमित काम नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

शहरातील विविध चौकांमध्ये ते उभे राहून भाडे मिळाल्यानंतर जात होते. मात्र, आता कामच मिळत नाही. मागील वर्ष कसेतरी काढले. मात्र यावर्षीही तीच अवस्था असल्यामुळे आता तर अनेकांनी हात टेकले आहेत.

बॉक्स

दुरुस्ती खर्चही निघत नाही

काम मिळत नाही. मात्र, एकाच जागेवर रिक्षा ठेवून असल्यामुळे खराब होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठीही पैसा लागतो. मात्र, तो पैसाही सध्या अनेकांजवळ नाही. त्यामुळे बाजारपेठ सुरू झाली तरी रिक्षाच्या दुरुस्ती कामामुळे आणखी वाटच बघावी लागणार आहे.

बाॅक्स

शासनाने मदत करावी

लाॅकडाऊन सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने विविध कामगार, मजुरांना विविध योजना जाहीर करून अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. मात्र, हातगाडी, रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

बाॅक्स

कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे साहित्य या वाहनांवरच नागरिक घेऊन जातात. मागील अनेक वर्षांपासून हातगाडी चालविण्याचे काम करतो. परंतु असे संकट आले नाही. चार पैसे मिळत होते. मात्र, आता काहीच मिळत नसल्याची खंत येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.