शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना कोरोनाचा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे ...

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे काम करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामध्ये रिक्षाचालकांचेही मोठे नुकसान होत असून जगण्याचा मोठा प्रश्न त्यांना पडला आह.

कोरोनामुळे प्रत्येकाचे नुकसान होत आहे. मात्रए ज्यांचे हातावर पोट आहे, रोजमजुरी करतात त्यांचे हाल सुरू आहेत. मागील वर्षी हे हाल कसेबसे सोसले. मात्र यावर्षीही लाॅकडाऊन झाल्यामुळे आता त्यांचाही संयम सुटला आहे. मात्र, इलाजच नसल्यामुळे काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना रिकामे रहावे लागत आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

शहरात जवळपास चारशे ते पाचशे हातरिक्षाचालक आहेत. ते विविध साहित्य पोहोचवून मिळालेल्या भाड्यामध्ये गाडीचे भाडे देऊन संसार चालवालचे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कामच नाही. नाही म्हणायला एखाद्याला किराणा सामान नेण्याचे काम मिळत आहे. मात्र, नियमित काम नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

शहरातील विविध चौकांमध्ये ते उभे राहून भाडे मिळाल्यानंतर जात होते. मात्र, आता कामच मिळत नाही. मागील वर्ष कसेतरी काढले. मात्र यावर्षीही तीच अवस्था असल्यामुळे आता तर अनेकांनी हात टेकले आहेत.

बॉक्स

दुरुस्ती खर्चही निघत नाही

काम मिळत नाही. मात्र, एकाच जागेवर रिक्षा ठेवून असल्यामुळे खराब होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठीही पैसा लागतो. मात्र, तो पैसाही सध्या अनेकांजवळ नाही. त्यामुळे बाजारपेठ सुरू झाली तरी रिक्षाच्या दुरुस्ती कामामुळे आणखी वाटच बघावी लागणार आहे.

बाॅक्स

शासनाने मदत करावी

लाॅकडाऊन सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने विविध कामगार, मजुरांना विविध योजना जाहीर करून अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. मात्र, हातगाडी, रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

बाॅक्स

कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे साहित्य या वाहनांवरच नागरिक घेऊन जातात. मागील अनेक वर्षांपासून हातगाडी चालविण्याचे काम करतो. परंतु असे संकट आले नाही. चार पैसे मिळत होते. मात्र, आता काहीच मिळत नसल्याची खंत येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.