शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना कोरोनाचा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे ...

चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे काम करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामध्ये रिक्षाचालकांचेही मोठे नुकसान होत असून जगण्याचा मोठा प्रश्न त्यांना पडला आह.

कोरोनामुळे प्रत्येकाचे नुकसान होत आहे. मात्रए ज्यांचे हातावर पोट आहे, रोजमजुरी करतात त्यांचे हाल सुरू आहेत. मागील वर्षी हे हाल कसेबसे सोसले. मात्र यावर्षीही लाॅकडाऊन झाल्यामुळे आता त्यांचाही संयम सुटला आहे. मात्र, इलाजच नसल्यामुळे काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना रिकामे रहावे लागत आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

शहरात जवळपास चारशे ते पाचशे हातरिक्षाचालक आहेत. ते विविध साहित्य पोहोचवून मिळालेल्या भाड्यामध्ये गाडीचे भाडे देऊन संसार चालवालचे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कामच नाही. नाही म्हणायला एखाद्याला किराणा सामान नेण्याचे काम मिळत आहे. मात्र, नियमित काम नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

शहरातील विविध चौकांमध्ये ते उभे राहून भाडे मिळाल्यानंतर जात होते. मात्र, आता कामच मिळत नाही. मागील वर्ष कसेतरी काढले. मात्र यावर्षीही तीच अवस्था असल्यामुळे आता तर अनेकांनी हात टेकले आहेत.

बॉक्स

दुरुस्ती खर्चही निघत नाही

काम मिळत नाही. मात्र, एकाच जागेवर रिक्षा ठेवून असल्यामुळे खराब होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठीही पैसा लागतो. मात्र, तो पैसाही सध्या अनेकांजवळ नाही. त्यामुळे बाजारपेठ सुरू झाली तरी रिक्षाच्या दुरुस्ती कामामुळे आणखी वाटच बघावी लागणार आहे.

बाॅक्स

शासनाने मदत करावी

लाॅकडाऊन सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने विविध कामगार, मजुरांना विविध योजना जाहीर करून अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. मात्र, हातगाडी, रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

बाॅक्स

कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे साहित्य या वाहनांवरच नागरिक घेऊन जातात. मागील अनेक वर्षांपासून हातगाडी चालविण्याचे काम करतो. परंतु असे संकट आले नाही. चार पैसे मिळत होते. मात्र, आता काहीच मिळत नसल्याची खंत येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.