शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सरपंच होण्याचे अनेकांचे स्वप्न कोरोनामुळे भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

येत्या जुलै महिन्यात जिल्ह्यात ५० च्यावर ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कधी नव्हे, इतकी स्पर्धा आता बघायला मिळत आहे. पूर्वी निधी खर्चाचे अधिकार फारसे नव्हते.

ठळक मुद्देकोरोना मदतीतून वाढविला जनसंपर्क : वर्षभरापासून सुरू आहे तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये शासनाने ग्रामपंचायतींना निधी खर्चाचे अतिरिक्त अधिकार दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये चुरस बघायला मिळत आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै, आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींवर निर्बंध आल्याने मागील वर्षभरापासून सरपंच होण्याची तयारी करणाऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.येत्या जुलै महिन्यात जिल्ह्यात ५० च्यावर ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कधी नव्हे, इतकी स्पर्धा आता बघायला मिळत आहे. पूर्वी निधी खर्चाचे अधिकार फारसे नव्हते. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक न होता बिनविरोध सदस्यांना निवडून दिल्या जात होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये हे चित्र पूर्णत: बदलले आहे. शासनाच्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना थेट निधी मिळत आहे. जनतेतून सरपंच व त्या सरपंचाला मिळालेले वाढीव अधिकार यामुळे गावपातळीवर स्पर्धा निर्माण झाली.दरम्यान, राज्य शासनाने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे गावपातळीवरील पुढारी पुन्हा कामाला लागले आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीची मुदत येत्या जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. मात्र कोरोनामुळे निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग आहेत.गावागावात विकासकामांच्या चर्चाकोरोनाची दहशत असतानाही मुदत संपुष्टात येत असलेल्या बहुतांश गावामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. मात्र शासनाच्या आदेशामुळे अनेकाचे स्वप्न भंगले आहे.यावर्षी गावागावांत मास्क, सॅनिटायझर, शक्य तितकी मदत, जीवनावश्यकवस्तू वाटप करून आपली उमेदवारी निश्चित करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. एवढेच नाही, तर घरोघरी संपर्कही वाढविला आहे.मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या सरपंच तसेच सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने सरपंच तसेच सदस्यांना मुदत वाढवून देण्याचीही मागणी अनेकांनी केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदनही देण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंच