शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कोरोना, मोबाइलच्या वेडाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

मोबाइल फोनद्वारे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन बाहेर निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे उच्च क्षमतेचे ...

मोबाइल फोनद्वारे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन बाहेर निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे उच्च क्षमतेचे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फिल्ड मेंदू व रक्तासाठी हानिकारक असतात. अति वापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.

सध्या मोबाइल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला, पण काळजीही महत्त्वाची आहे. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक जण मोबाइलवर अवलंबून आहेत. मोबाइलचे फायदे असले, तरी तोटेही आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कान व डोळ्यांचे अनेक आजार होतात मोठ्यांपासून तर लहान मुलांपर्यंत सारेच जण मोबाइलच्या अधीन होत चालले आहेत. त्यातच आता कोरोना संसर्गाने पुन्हा धास्ती निर्माण केली. परिणामी, अनेकांची झोप उडाली आहे. अशा संकटातून बाहेर निघण्यासाठी तत्काळ आरोग्य उपचार आणि समुपदेशन काळाची गरज ठरली आहे, असा निष्कर्ष डॉक्टरांनी मांडला आहे.

शारीरिक हालचाली कमी झाल्या

मोबाइलमुळे अनेकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आळशीपणा वाढू लागला. जवळच्या दुकानातून सामान आणायचे असले, तरी पायी न जाता थेट फोन करून होमडिलिव्हरीद्वारे सामान मागविले जाते. अशा आळशीपणाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कोरोनामुळे अनेकांनी सकाळी फिरणे बंद केले. शरीराच्या हालचाली कमी झाल्याने झोप व आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

मोबाइल रेडिएशनचा वेग हा ८८४ एमएच २ इतका असतो, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे झोपेवर परिणाम होण्याचा धोका आहे. सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रता नष्ट होते. शारीरिक व मानसिक ताण पडतो. मुले अभ्यास करताना मोबाइलवर गेम खेळत असतात व इंटरनेटचा वापर करतात. सेलफोनच्या रेडिएशनचा वाईट परिणाम आपल्या ब्रेनवरही होऊ शकतो. सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले, तरीही लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे लक्ष विचलित होते, अशी माहिती डॉ.माडूरवार यांनी दिली.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

चांगली झोप येण्यासाठी कोणत्याही वयोगटातील नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये, असा सल्ला चंद्रपुरातील मनोविकार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत बेंडले यांनी दिला. कोरोना साथीचे दिवस असल्याने काही आजाराच्या लक्षणांवरून नागरिकांमध्ये भीती उत्पन्न होऊ शकते. मात्र, घाबरण्याचे काही कारण नाही. कोविड १९ सदृश्य लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करून घेण्यासाठी केंद्रात जावे. असेही त्यांनी सांगितले.

कोट

आरोग्य सुदृढ राहण्यासाठी किमान सहा तास झोप घेणे अत्यावश्यक आहे. आजाराच्या धास्तीने, मोबाइल किंवा कॉम्प्यूटरच्या अतिवापराने शरीरावर दुष्परिणाम होतो. विविध गॅजेट्सच्या आहारी गेल्याने निद्रानाश जाणवू लागतो. डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात. हे शरीरासाठी हानिकारक आहे. मोबाइलचा अतिवापर करणे थांबवून त्याऐवजी मन शांत करणारे आवडीचे एखादे चांगले पुस्तक वाचावे. शांत संगीत ऐकावे. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.

-डॉ.विवेक माडूरवार, हृदयविकार तज्ज्ञ, चंद्रपूर