शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एसटीची प्रवासी संख्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

कोरोनामुळे २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरु केल्या. सुरुवातीला प्रवासी संख्या अत्यल्प होती. मात्र त्यानंतर प्रवासी संख्या वाढायला लागली. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ्या वाढविल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारातून २२५ बसेस ८० हजार किमीचा प्रवास करीत आहेत.

ठळक मुद्देसंसर्गाची भीती : विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रवास करण्यावर निर्बंध लादले आहेत. मात्र तरीसुद्धा प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरु केल्या. सुरुवातीला प्रवासी संख्या अत्यल्प होती. मात्र त्यानंतर प्रवासी संख्या वाढायला लागली. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ्या वाढविल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारातून २२५ बसेस ८० हजार किमीचा प्रवास करीत आहेत. लॉकडाऊन नंतर प्रवासी संख्या वाढली असून महामंडळाच्या तिजोरीतही वाढ होत आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून लॉकडाऊनही सुरु झाले आहे. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र तरीसुद्धा प्रवासी संख्या जैसे थे आहे. पूर्वी सुमारे ५० ते ६० हजार दरम्यान प्रवासी वाहतूक होत होती. आताही त्याच प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंदचगाव तेथे एसटी अशी राज्य परिवहन महामंडळाने मोहीम राबवली. या मोहिमेतंर्गत जेथे रस्ता असेल तेथे एसटी धावत होती. मात्र कोरोनामुळे २३ मार्चपासून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. परंतु, अद्यापही ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहेत. विशेष करुन जिवती, कोरपना तालुक्यातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. तसेच रात्रीच्या अनेक बसफेऱ्या बंद केल्या आहेत. ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगकोरोनानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने बस भरुन धावत आहेत. मात्र बहुतांश प्रवासी मास्कचा वापर करताना दिसून येत नाही. तसेच बसमध्ये गर्दी राहत असल्याने एका सिटवर कधी दोन तर कधी तीनजण बसून प्रवास करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. 

बाह्य जिल्ह्यातही प्रवासी वाहतूकचंद्रपूर आगारातून अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा यासह लांब पल्ल्याच्याही बसफेऱ्या धावतात. मात्र यवतमाळ, नागपूर, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. लॉकडाऊनही सुरु आहे. परंतु, येथे बसफेऱ्या धावत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या