शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

कोरोना अद्याप गेला नाही, या चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही, नागरिकांची सर्वत्र गर्दी कोरोना चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचा कानाडोळा लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर : ...

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही, नागरिकांची सर्वत्र गर्दी

कोरोना चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचा कानाडोळा

लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. पहिल्या लाटेतील बेजबाबदारपणा यावेळी नागरिकांच्या अंलगट आला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान आता तरी नागरिकांनी जबाबदारीने आणि कोरोना नियमांना पाळणे गरजेचे आहे. नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .

जिल्ह्यामध्ये कोरोनाची पहिली लाट आली. अनलाॅक होतपर्यंत जिल्ह्यात केवळ ५९७ रुग्ण होते तर २ दोघांचा मृत्यू झाला होता. ही लाट नागरिकांनी मनावर घेतली नाही. नियम असतानाही अनेकांनी नियमांना तिलांजली दिली. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम एवढेच नाही तर शाळा तसेच इतर सर्वच व्यवहार बिनदिक्कतपणे सुरू करण्यात आले. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि आता रुग्णसंख्या हजारोंच्या घरात जाऊन पोहचली. या लाटेमध्ये अनेकांना आपल्या जवळच्यांना गमवावे लागले. ज्येष्ठांसह तरुणांचाही यामध्ये बळी गेला. कोरोना नियमांना पाळले असते तर किमान या जीवांना आपण वाचवू शकलो असतो. मात्र कोरोना नसल्यासारख्या स्थितीत प्रत्येक जण वावरत राहिले. १ जूनपर्यंत जिल्ह्यात ८२ हजार ९०३ एकूण कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये १ हजार ४५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना संकटाला नागरिकांनी मनावर घेतले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भ‌वल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये अनलाॅक होताच अनेकांनी लग्नसमारंभ मोठ्या थाटात साजरे केले. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमही मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आले. मोर्चे, आंदोलन आदी सर्व करण्यात आले. परिणामी कोरोनाची दुसरी लाट अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त करून गेली. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी किमान आता तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

बाॅक्स

ॲनलाॅक

पहिला

४ ऑगस्ट २०२०

५९७

मृत्यू २

--

१ जूनपर्यंत

८२९०३

मृत्यू

---

महापालिका, महसूल विभागांच्या पथकांची नजर

१)कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. अनेकांची जीव गेला. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महापालिका तसेच महसूल प्रशासनाने विविध पथकांच्या माध्यमातून कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला.

२ शहरातील विविध दुकानांवर बंदी असताना अनेकांनी लपून, छपून व्यवसाय सुरूच ठेवला. त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही तसेच लग्न समारंभामध्ये १२ नागरिकांनाच परवानगी असतानाही काहींनी नियम तोडला. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या पथकांकडून व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, पालिका, महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या पथकांनीही शहरात गस्त घालणे सुरू केले.