शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

कोरोना अद्याप गेला नाही, या चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही, नागरिकांची सर्वत्र गर्दी कोरोना चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचा कानाडोळा लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर : ...

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही, नागरिकांची सर्वत्र गर्दी

कोरोना चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचा कानाडोळा

लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. पहिल्या लाटेतील बेजबाबदारपणा यावेळी नागरिकांच्या अंलगट आला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान आता तरी नागरिकांनी जबाबदारीने आणि कोरोना नियमांना पाळणे गरजेचे आहे. नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .

जिल्ह्यामध्ये कोरोनाची पहिली लाट आली. अनलाॅक होतपर्यंत जिल्ह्यात केवळ ५९७ रुग्ण होते तर २ दोघांचा मृत्यू झाला होता. ही लाट नागरिकांनी मनावर घेतली नाही. नियम असतानाही अनेकांनी नियमांना तिलांजली दिली. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम एवढेच नाही तर शाळा तसेच इतर सर्वच व्यवहार बिनदिक्कतपणे सुरू करण्यात आले. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि आता रुग्णसंख्या हजारोंच्या घरात जाऊन पोहचली. या लाटेमध्ये अनेकांना आपल्या जवळच्यांना गमवावे लागले. ज्येष्ठांसह तरुणांचाही यामध्ये बळी गेला. कोरोना नियमांना पाळले असते तर किमान या जीवांना आपण वाचवू शकलो असतो. मात्र कोरोना नसल्यासारख्या स्थितीत प्रत्येक जण वावरत राहिले. १ जूनपर्यंत जिल्ह्यात ८२ हजार ९०३ एकूण कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये १ हजार ४५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना संकटाला नागरिकांनी मनावर घेतले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भ‌वल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये अनलाॅक होताच अनेकांनी लग्नसमारंभ मोठ्या थाटात साजरे केले. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमही मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आले. मोर्चे, आंदोलन आदी सर्व करण्यात आले. परिणामी कोरोनाची दुसरी लाट अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त करून गेली. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी किमान आता तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

बाॅक्स

ॲनलाॅक

पहिला

४ ऑगस्ट २०२०

५९७

मृत्यू २

--

१ जूनपर्यंत

८२९०३

मृत्यू

---

महापालिका, महसूल विभागांच्या पथकांची नजर

१)कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. अनेकांची जीव गेला. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महापालिका तसेच महसूल प्रशासनाने विविध पथकांच्या माध्यमातून कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला.

२ शहरातील विविध दुकानांवर बंदी असताना अनेकांनी लपून, छपून व्यवसाय सुरूच ठेवला. त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही तसेच लग्न समारंभामध्ये १२ नागरिकांनाच परवानगी असतानाही काहींनी नियम तोडला. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या पथकांकडून व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, पालिका, महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या पथकांनीही शहरात गस्त घालणे सुरू केले.