शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

कोरोना ‘डेथ रेट’ रोखण्यासाठी ‘अर्ली डिटेक्शन’वर फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

वाढते कोरोना रूग्ण व प्रतिबंधक उपाययोजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देवून जिल्हाधिकारी गुल्हाणे पुढे म्हणाले, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना स्वगावी येण्यापूर्वी आरोग्य तपासणीसाठी केंद्र तयार करण्यात आले होते. आता जिल्हाबंदी उठल्याने हे सर्व केंद्रे बंद करून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरीत केले. अशा केंद्रांमध्ये सद्यस्थितीत १,३०० बेड्स उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचा ‘लोकमत’शी संवाद : आरोग्य सुविधा वाढविण्याकडे विशेष लक्ष

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर दुसरीकडे बाधितांचा जिल्ह्यातील मृत्यू दर (डेथ रेट) ही वाढत आहे. मूळात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतरही काही रूग्ण धास्तीमुळे उपचारासाठी उशिरा रूग्णालयात दाखल होतात. उपचार करण्यास डॉक्टरांना दोन-चार दिवसही मिळत नाही. अशाच रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘डेथ रेट’ रोखण्यासाठी ‘अर्ली डिटेक्शन’ (लवकर निदान) आणि जादा आरोग्यसुविधा वाढविण्यावर यापुढे फोकस राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली.वाढते कोरोना रूग्ण व प्रतिबंधक उपाययोजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देवून जिल्हाधिकारी गुल्हाणे पुढे म्हणाले, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना स्वगावी येण्यापूर्वी आरोग्य तपासणीसाठी केंद्र तयार करण्यात आले होते. आता जिल्हाबंदी उठल्याने हे सर्व केंद्रे बंद करून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरीत केले. अशा केंद्रांमध्ये सद्यस्थितीत १,३०० बेड्स उपलब्ध आहेत. गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्रिटीकल केअर सेंटर व आयसीयु बेड्स सज्ज ठेवल्या असून लिक्विड आॅक्सिजन प्लांटही लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.असे आहेत ‘अर्ली डिटेक्शन‘चे फायदेकोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अर्ली डिटेक्शन’ म्हणजे लवकर निदानाचे फायदे याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, आजार लपवून लॅटर स्टेजमध्ये उपचारासाठी येणे जीवावर बेतणारे आहे. त्यामुळे यापुढे ‘अर्ली डिटेक्शन’ भर देणे सुरू झाले. लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी केली जाते. याशिवाय आयएलआय व सारी आदी सर्वेक्षण करून कोरोना स्प्रेड रोखला जावू शकतो. लवकर निदानामुळे कोरोनाचे स्पॉट निश्चित करता येतात. यासाठी जिल्ह्यातील ५० वर्षांवरील नागरिकांची पल्स आॅक्झिमीटरने टेस्टींग सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.‘होम आयसोलेशन’चाही पर्याय४सौम्य व लक्षणे नसणाºया कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना जर त्यांच्या घरांमध्ये योग्य प्रकारे सुविधा असतील तर घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देता येईल. त्याकरिता केंद्र सरकारच्या ७ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे लागते. गृहविलगीकरणाची पात्रता, वैद्यकीय मदत कशी घ्यायची, होम आयसोलेशनच्या पायºया निश्चित केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी ‘लोकमत’ दिली.‘जनता कर्फ्यू’ जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठीचकोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्र्रपूर महानगरपालिका क्षेत्र व बल्लारपूर शहरात १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर रविवारपर्यंत जनता कर्फ्यू होणार आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीनेच निर्णय झाला. जनता कर्फ्यू हा नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठीच आहे. या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे. कुणाचीही चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली तरी घाबरू नका. मात्र, कोरोना आजार कदापि लपवून ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी संवादादरम्यान केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या