शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 15:16 IST

ssc, hsc supplementary exam, Nagpur News नागपूर विभागीय मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेबाबत कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नसल्याने राज्यातील सुमारे २२ हजार ८३५ विद्यार्थ्यांना पुरवणी परिक्षेची प्रतीक्षा लागत आहे.

ठळक मुद्दे२२ हजार ८३५ विद्यार्थ्यांना परिक्षेची प्रतीक्षामंडळाच्या सूचनांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

राजकुमार चुनारकर

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावी परिक्षांचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले. आता दोन महिन्यांचा कालावधी झाला असताना नागपूर विभागीय मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेबाबत कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नसल्याने राज्यातील सुमारे २२ हजार ८३५ विद्यार्थ्यांना पुरवणी परिक्षेची प्रतीक्षा लागत आहे.

राज्य मंडळाकडून दरवर्षी दहावी, बारावी फेरपरीक्षांचे नियोजन जुलै महिन्यात होते. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या परिक्षांचे निकालच जुलै महिन्यात जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळातंर्गत दहावी परीक्षेसाठी मंडळातील १ लाख ६२ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ६१ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक लाख ५१ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नऊ हजार ९४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावी परीक्षेसाठी एक लाख ५५ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ५४ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामधून एक लाख ४१ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण तर १२ हजार ८९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

पुरवणी परिक्षेसाठी दहावी, बारावीचे एकूण २२ हजार ८३५ विद्यार्थी राज्य मंडळाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबर महिना संपत आला असला तरी दहावी, बारावी फेरपरीक्षांचे ऑनलाईन अर्ज, परिक्षेचे स्वरूप, वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना अजूनही प्राप्त झालेल्या नाहीत. पुरवणी परिक्षांचा निर्णय राज्यस्तरावर होणार असल्याने शिक्षक, विद्यार्थीसुद्धा संभ्रमात आहेत.मागील वर्षी २२ हजार ८३५ विद्यार्थी अनुत्तीर्णनागपूर विभागीय मंडळात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. दहावी, बारावीचे २२ हजार ८३५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये दहावीचे भंडारा जिल्ह्यातील ९८२, चंद्रपूर दोन हजार २५७, नागपूर तीन हजार २८१, वर्धा एक हजार ३२३, गोंदिया ९८२, गडचिरोली एक हजार ११९ तर बारावीचे भंडारा एक हजार १०७,चंद्रपूर २ हजार ६५७,नागपूर ४ हजार ४८२, वर्धा दोन हजार ०४४, गोंदिया एक हजार १७३, आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार ४२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दहावी, बारावी पुरवणी परिक्षेसंदर्भात राज्य मंडळाकडून सूचना प्राप्त झाल्या नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अर्ज, वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना राज्य मंडळाकडून मिळताच नागपूर विभागीय मंडळअंतर्गत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे नियोजन केले जाईल- पुनम मस्केशिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :examपरीक्षा