शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक ...

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. बाधिताच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना होऊ नये, यासंदर्भातही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेऊन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आली. चंद्रपुरात महानगर पालिकेचे कर्मचारी हे कार्य करीत आहेत. रक्ताच्या नात्यांनी नाकारले तरी मृतदेहाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करीत आहेत, अशी माहिती पथकातील एका कर्मचाऱ्याने दिली.

पाच व्यक्तींना परवानगी पण मृतांच्या नशिबी तेही नाही

कोरोना बाधित मृताच्या अंत्यसंस्कारासाठी पीपीई किट घालून पाच व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. परंतु, काही कुटुंब आपले रक्ताचे नातेही पाळत नाही. ‘तुम्हीच अंत्यसंस्कार करा, आम्ही येऊ शकत नाही’ असे म्हणून प्रतिसाद देत नाही. चंद्रपूर शहरात मार्च महिन्यात अशा घटना घडल्या आहेत. शासनाने परवानगी देऊनही मृतांच्या नशिबी तेही येत नाही. त्यामुळे महानगर पालिकेचे कर्मचारी जणू देवदूत म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

सरपंच, पोलीस पाटलांचा मोठेपणा

ग्रामीण भागातही कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करीत नसल्याचे चित्र आहे. कोरोनापूर्वी अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे काम म्हणून नागरिक मदतीला धावून यायचे. कोरोनामुळे माणुसकी आटली. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये सरपंच व पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी पुढे येत आहेत.

कोट

मृताच्या नातेवाईकांनी घाबरू नये. पीपीई किट घालून आपल्या स्नेहीजनाला शेवटचा निरोप देता येतो. खबरदारी घेऊन आपल्या धार्मिक प्रथा, परंपराही पाळता येतात. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.

-एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर

मृतदेहापासून दूर उभे राहून दर्शन घेता येते. आम्ही अशा कुटुंबांना मनाई करीत नाही. मात्र, नियमांचे पालन केले पाहिजे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू वेदनादायीच आहे. पण, गैरसमजापासून दूर राहून अखेरचा निरोप दिला पाहिजे.

एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर