शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक ...

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. बाधिताच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना होऊ नये, यासंदर्भातही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेऊन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आली. चंद्रपुरात महानगर पालिकेचे कर्मचारी हे कार्य करीत आहेत. रक्ताच्या नात्यांनी नाकारले तरी मृतदेहाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करीत आहेत, अशी माहिती पथकातील एका कर्मचाऱ्याने दिली.

पाच व्यक्तींना परवानगी पण मृतांच्या नशिबी तेही नाही

कोरोना बाधित मृताच्या अंत्यसंस्कारासाठी पीपीई किट घालून पाच व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. परंतु, काही कुटुंब आपले रक्ताचे नातेही पाळत नाही. ‘तुम्हीच अंत्यसंस्कार करा, आम्ही येऊ शकत नाही’ असे म्हणून प्रतिसाद देत नाही. चंद्रपूर शहरात मार्च महिन्यात अशा घटना घडल्या आहेत. शासनाने परवानगी देऊनही मृतांच्या नशिबी तेही येत नाही. त्यामुळे महानगर पालिकेचे कर्मचारी जणू देवदूत म्हणून कर्तव्य बजावत आहेत.

सरपंच, पोलीस पाटलांचा मोठेपणा

ग्रामीण भागातही कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करीत नसल्याचे चित्र आहे. कोरोनापूर्वी अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे काम म्हणून नागरिक मदतीला धावून यायचे. कोरोनामुळे माणुसकी आटली. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये सरपंच व पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी पुढे येत आहेत.

कोट

मृताच्या नातेवाईकांनी घाबरू नये. पीपीई किट घालून आपल्या स्नेहीजनाला शेवटचा निरोप देता येतो. खबरदारी घेऊन आपल्या धार्मिक प्रथा, परंपराही पाळता येतात. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.

-एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर

मृतदेहापासून दूर उभे राहून दर्शन घेता येते. आम्ही अशा कुटुंबांना मनाई करीत नाही. मात्र, नियमांचे पालन केले पाहिजे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू वेदनादायीच आहे. पण, गैरसमजापासून दूर राहून अखेरचा निरोप दिला पाहिजे.

एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर