शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST

पंतप्रधान गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात अल्प उत्पन्न असलेल्या महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले. यामुळे ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मोलमजुरी ...

पंतप्रधान गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात अल्प उत्पन्न असलेल्या महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले. यामुळे ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मोलमजुरी करून चार पैसे मिळवून जगणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलिंडर मिळाला मात्र सातत्याने सिलिंडरचे वाढणारे भाव डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. कसेबसे करून आजपर्यंत सिलिंडर भरला मात्र आता अवाक्याबाहेर जात आहे. विशेष म्हणजे, आता शासनाने केरोसिनही देणे बंद केल्यामुळे महिलांना जंगलामध्ये जीव धोक्यात टाकून सरपण गोळा केल्याशिवाय पर्यायच नाही.

बाॅक्स

सिलिंडर भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून

यावर्षी कोरोना संकटामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. यातून कसाबसा मार्ग काढत जीवन जगणे सुरु आहे. यातही महागाई तसेच सिलिंडरचे दर वाढल्यामुळे गरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडिंडरचे दर वाढले त्यामुळे भरण्याचा प्रश्न असतानाच केरोसीनही बंद आहे. त्यामुळे महिलांना सरपण गोळा करावे लागत आहे. मात्र सरपण आणणेही आता धोकादायक ठरत आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वन्यप्राणी मोठ्या संख्येने असल्यामुळे एकीकडे आड दुसरीकडे विहिर अशी काहीशी अवस्था ग्रामीण महिलांची झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर दराचा आढावा

जानेवारी २०२०२-६४५

फेब्रुवारी २०२०- ७६०

जानेवारी २०२१-७५०

फेब्रुवारी २०२१-८०२

--

गृहिणींच्या प्रतिक्रिया

उज्ज्वला गॅस मिळाल्यामुळे आनंद झाला. मात्र तो काही दिवसांसाठीचाच होता. सातत्याने वाढणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सिलिंडर भरणे परडणारे नाही. त्यातच महागाई वाढत आहे. त्यामुळे महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने सिलिंडरच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.

- सुनंदा देशमुख

किरमीटी

--

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे गरिबांना जगणे कठीण झाले आहे. असे असतानाच गॅस सिलिंडरची भाववाढ करून शासनाने गरिबांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सिलिंडरचे दर कमी करावे. सध्या सरपण गोळा करून चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

कुंदा नवघडे, मिंथुर

--

ग्रामीण भागात लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजनेतून गॅससिलिंडर मिळाले. मात्र आता सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे गरिबांना सिलिंडर भरणे कठीण जात आहे. शासनाने सिलिंडरचे भाव कमी करून गरिबांना दिलासा देणे गरजेचे आहे.

-

सरकारने गॅससिलिंडर दिल्यामुळे आनंद झाला. मात्र सासत्याने वाढणारे दर बघून चुलीवरच स्वयंपाक करणे परवडणारे असल्यामुळे पुन्हा चूल पेटवली आहे. सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून गोरगरिबांना परवडेल इतक्या कमी किमतीवर तो उपलब्ध करून द्यावा.

-

वाढत्या महागाईमुळे मोठी अडचण जात आहे. प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत आहे. गॅससिलिंडरचे दर वाढले आहे. त्यातच सबसिडीही देणे बंद केले आहे. त्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. सिलिंडरचे भाव कमी करणे गरजेचे आहे.