शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

दिल्लीच्या किसान मोर्चासाठी शंभर वाहनांचा ताफा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST

ब्रम्हपुरी : केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके आणली असून हे शेतकरीविरोधी जाचक काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी ...

ब्रम्हपुरी : केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके आणली असून हे शेतकरीविरोधी जाचक काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी दीड महिन्यापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून शेकडो गाड्यांनी ३ जानेवारी रोजी नागपूर येथील संविधान चौकात विशाल सभा घेऊन सावनेर मार्गे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झालेत. केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी कृषीची तीन विधेयके आणली. या विधेयकाला हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांच्या शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. कृषी विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून भर थंडीत दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची अद्यापही केंद्र सरकारने दखल घेतली नाही. म्हणून आंदोलनकर्त्याना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेचा शंभर वाहनांचा ताफा दिल्लीकडे रवाना झाला. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, किसान सभेचे कार्यकर्ते श्रीधर वाढई, आयटक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष वनिता कुंटावार, नानाजी दांडेकर, तुळशीराम मेश्राम, उषा बोरकर, रेश्मा कोटरांगे, नानाजी मेश्राम यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.