शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: January 19, 2016 00:42 IST

देशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मागील नाकर्त्या शासनामुळे या सरकारवर जनतेच्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे.

कार्यकर्ता प्रशिक्षण : हंसराज अहीर यांनी दिल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचनाचंद्रपूर : देशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मागील नाकर्त्या शासनामुळे या सरकारवर जनतेच्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे. सरकार जनसामान्यांच्या विकासासाठी सर्व पातळीवर अपेक्षित परिवर्तन घडवण्यासाठी कार्य करीत असून सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामाची आणि लोकहित निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारून लोककल्याण योजना राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत स्थानिक दाताळा रोडवरील लॉन येथे आयोजित प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, हरिश शर्मा, देवराव भोंगळे, रामपाल सिंह, प्रमोद कडू, ब्रिजभूषण पाझारे, वनिता कानडे, अंजली घोटेकर, नामदेव डाहुले, बंडू पदलमवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ना. अहीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती देताना मेक इन इंडिया, स्कील इंडिया आणि डिजीटल इंडियामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगत युवकांनी आता उद्योगाकडे वळून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान द्यावे. तसेच पारंपारिक रोजगाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार करता येणे शक्य असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट करताना त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात पारंपारिक रोजगाराकडे लोकांना आकृष्ट करण्यासाठी कार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले.भाजप पक्ष संघटना आणि सरकार यांच्यातील समन्वयाबद्दल सांगताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशिक्षित कार्यकर्ता ही काळाची गरज असून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जबाबदार कार्यकर्ता घडेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांच्या अविश्रांत परिश्रमातूनच पक्ष संघटन अधिक मजबूत होवून तो सत्तेच्या जवळ पोहचतो. आज सत्तेच्या माध्यमातून आपण हे सत्य अनुभवतो आहोत. राज्य सरकारने राज्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. परंतु या योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी उचलल्याखेरीज हे साध्य होणार नाही. कार्यकर्त्यांनी हे कार्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी आ. नाना शामकुळे यांनी पक्षाच्या संघटनेत कार्यकर्त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व विषद करून आज आपण सत्तेवर असल्याने कार्यकर्त्यांची जबाबदारी शतपटीने वाढली आहे. पक्षाचे कार्यकर्ते हे समाजाभिमुख असल्याने त्याचा लाभ पक्षीय संघटना मजबुतीने उभी होण्यात झालेला आहे. भारतीय राज्यघटनेने समान न्याय ही संकल्पना मांडली आहे. त्यामुळे शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभ त्या-त्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी या योजनांची सर्वकष माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत या योजना पोहचतात किंवा नाही, याची दक्षताही एक जबाबदार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ विभागीय कार्यालय प्रमुख संजय फांजे यांनी मिडिया व्यवस्थापन व सोशल मिडियामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर सखोल विवेचन केले. प्रमोद कडू यांनी जनसंघ ते भाजपा या वाटचालीचा परामर्श घेतला. या कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष विजय राऊत, भाजपा नेते प्रमोद कडू, देवराव भोंगळे उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा महामंत्री हरिश शर्मा यांनी केले. संचालन अंजली घोटेकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)