शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:37 IST

भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचतर्फे रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या व्याख्यानात ते बोलत होते

ठळक मुद्देबी. जी. कोळसे पाटील : प्रियदर्शिनी सभागृहात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचतर्फे रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या व्याख्यानात ते बोलत होतेअध्यक्षस्थानी विनोद सोनटक्के, स्वागताध्यक्ष प्रशांत गजभिये तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. चेतन खुटेमाटे, सुधाकर अडबाले, कपिल सरदार, डॉ. विनोद माहुरकर, नितीन डोंगरे दिलीप वावरे उपस्थित होते. बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, वंचित समाजाच्या कल्याणासाठी अल्प तरतुद केली जाते. हा प्रकार अन्यायकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक चळवळ उभारली. आजच्या धर्मांध वातावरणात नागरिकांनी संविधानाच्या बाजुने उभे राहून विषमतावादी विचारांचा प्रतिकार करावा, असेही निवृत्त न्यायमुर्ती कोळसे पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष म्हणून विनोद सोनटक्के म्हणाले, संविधान हेच खरे स्वातंत्र्य होय. मंचाच्या वतीने नागरिकांच्या घरी भारतीय संविधान हा राष्टÑीय गं्रथ पोहोविण्याचा संकल्प करण्यात आला होता. १ जानेवारीला करून कोरेगाव भीमा येथील शूरविरांना मानवंदना देण्याचे कार्य केले. संविधान दिन साजरा करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ९८६ नागरिकांच्या घरी १ हजार ९८६ संविधान ग्रंथ पोहोचविण्याचा संकल्प केला. डॉ. खुटेमाटे म्हणाले, संविधानात स्वातंत्र्य, समता, न्यायाचा विचार आहे. भारताचा नागरिक गरीब असताना देशात श्रीमंताची वाढ झपाट्याने झाली. युवकांना शिक्षण, रोजगाराची गरज असताना बजेटमध्ये कमी रक्कम तरतूद केल्या जाते. संचालन रितीक खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.