शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

ग्रामीण भागातही कॉन्व्हेट शाळांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:15 IST

इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटची संख्या वाढू लागली. पालकांच्या दृष्टीने एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. पण दुसरीकडे काही संस्थानी आवश्यकता नाही अशा गावांमध्येही कॉन्व्हेंट सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देपायाभूत सुविधाच नाही : गुणात्मक प्रगतीकडे संस्थाचालकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटची संख्या वाढू लागली. पालकांच्या दृष्टीने एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. पण दुसरीकडे काही संस्थानी आवश्यकता नाही अशा गावांमध्येही कॉन्व्हेंट सुरू केल्या आहेत.सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट सुरू करण्यात आल्याने आता शिक्षण महागले आहे. यापैकी किती कॉन्व्हेंटना मान्यता आहे, याची देखील पालकांना कल्पना नाही. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू केल्या जाणाऱ्या कॉन्व्हेंटवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.अडीच ते पाच वर्षे वय असणाºया बालकांना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला जातो. निटनेटका ड्रेस, टाय, बेल्ट आयकार्ड, पाठीवर दप्तर, टिफीन, वॉटरबॅग आदी साहित्यांनी सजलेला आपला पाल्य बघून पालकांना आनंद वाटणे स्वाभाविक आहे. मुलगा अथवा मुलगी कॉन्व्हेंटमध्ये जातात. चांगल्या गोष्टी शिकतात. उत्तम सवयी लागतात. कविता म्हणून दाखवितात. या बाबी सत्य असल्या तरी सर्वच कॉन्व्हेंटमध्ये असे घडत नाही. बालकांच्या मानसिकतेनुसार अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो का, या गोष्टींकडे संस्थाचालकांचे लक्ष नसते.गुणात्मक प्रगतीवर संख्यात्मक प्रगती वरचढ झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतील आनंद पार विरून गेला आहे. त्याची जागा घोकमपट्टीने घेतल्याची नाराजी काही जागरूक पालक व्यक्त करीत आहेत. कॉन्व्हेंटमध्ये अध्यापन करणारे किती शिक्षक प्रशिक्षित असतात. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती कोणत्या, हे संस्थेकडून कधीही पुढे येऊ दिल्या जात नाही.ज्या कोवळ्या वयात बालकांच्या मनाला वळण द्यायचे असते ते काम तज्ज्ञ शिक्षकांकडून होणे अपेक्षित असते. परंतु बºयाच ठिकाणी तसे होताना दिसत नाही. आपली कोवळी फुले कोमेजून तर जाणार नाही, याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. शहर ते गावापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला अनेक कॉन्व्हेंटचे फलक लागले दिसतात. विविध सुविधांचे त्यामध्ये प्रदर्शनदेखील केलेले असते. प्रत्यक्षात किती कॉन्व्हेंटमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात, हे सांगणे मात्र कठीण आहे. पालक चमक- धमक बघून कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. हीच बाब हेरुन ग्रामीण भागात कॉन्व्हेंट वाढू लागल्या आहेत.श्रीमंत मंडळी करीत आहेत गुंतवणूकशहरात स्थानिक व्यक्ती किंवा परिसरातील व्यक्तीकडून कॉन्व्हेंट, शाळा, महाविद्यालय सुरू केल्या जात होते. मात्र पालकांचे शिक्षणाप्रती वाढलेले आकर्षण व मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढे पैसे खर्च करण्याची कमजोरी बघून आता मोठे ग्रुपही हातपाय पसरत आहेत. जिल्ह्यात सध्या आर्थिकदृष्ट्या शक्तीवान मंडळी फ्रेंचायसीवर कॉन्व्हेंट सुरू करीत आहेत. दरवर्षी नव्या कॉन्व्हेंटची भर पडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.