शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:36 IST

शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत.

ठळक मुद्दे९ फेब्रुवारीचे ‘ते’ परिपत्रक रद्द करा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. मात्र राज्य शासनाने ९ फेब्रुवारीला परिपत्रक काढून कंत्राटी पदावरील नेमणूका शासन सेवेत नियमित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरूद्ध एल्गार पुकारत जिल्ह्यातील २७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.चंद्रपूर जिल्हास्तरीय शासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेसमोरून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चाचे नेतृत्व समितीचे संयोजक अ‍ॅड. शैलेश मुंजे, राकेश नाकाडे, बंडू हिरवे, विजय ढोले, गोविंद कुंभारे, पंकज शेंडे, सतीश वाढई, सारिका बद्देला यांनी केले. हा मोर्चा कस्तुरबा रोड मार्गे गांधी चौक, जटपुरा गेटवरून शासनाविरूद्ध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे सभा झाली. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन करून युती सरकारचा निषेध केला.गेल्या १५ ते २० वर्षांपासून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देत असून शासनाने दिलेली कामे वेळेवर पूर्ण केले जात आहे. केव्हा तरी शासन आम्हाला सेवेत नियमित करेल, या आशेवर कर्मचारी असताना युती शासनाने अटी शर्तीबाबत सेवेत कंत्राटी नियुक्त कर्मचाऱ्याला सेवेत कायम न करण्याचा परिपत्रक काढला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. शासनाने जाचक परिपत्रक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या मोर्चात जिल्हाभरातील महिला व पुरूष अशा २ हजार ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.अशा आहेत मागण्याकंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, तीन वर्षांनंतर पुनर्निवडीची अट रद्द करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ३० दिवसांची वैद्यकीय रजा व वैद्यकीय देयकाची प्रतीपुर्ती द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम-समान वेतन लागू करावे, भविष्य निर्वाह निधी लागू करावी.