शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:36 IST

शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत.

ठळक मुद्दे९ फेब्रुवारीचे ‘ते’ परिपत्रक रद्द करा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. मात्र राज्य शासनाने ९ फेब्रुवारीला परिपत्रक काढून कंत्राटी पदावरील नेमणूका शासन सेवेत नियमित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरूद्ध एल्गार पुकारत जिल्ह्यातील २७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.चंद्रपूर जिल्हास्तरीय शासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेसमोरून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चाचे नेतृत्व समितीचे संयोजक अ‍ॅड. शैलेश मुंजे, राकेश नाकाडे, बंडू हिरवे, विजय ढोले, गोविंद कुंभारे, पंकज शेंडे, सतीश वाढई, सारिका बद्देला यांनी केले. हा मोर्चा कस्तुरबा रोड मार्गे गांधी चौक, जटपुरा गेटवरून शासनाविरूद्ध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे सभा झाली. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन करून युती सरकारचा निषेध केला.गेल्या १५ ते २० वर्षांपासून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देत असून शासनाने दिलेली कामे वेळेवर पूर्ण केले जात आहे. केव्हा तरी शासन आम्हाला सेवेत नियमित करेल, या आशेवर कर्मचारी असताना युती शासनाने अटी शर्तीबाबत सेवेत कंत्राटी नियुक्त कर्मचाऱ्याला सेवेत कायम न करण्याचा परिपत्रक काढला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. शासनाने जाचक परिपत्रक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या मोर्चात जिल्हाभरातील महिला व पुरूष अशा २ हजार ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.अशा आहेत मागण्याकंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, तीन वर्षांनंतर पुनर्निवडीची अट रद्द करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ३० दिवसांची वैद्यकीय रजा व वैद्यकीय देयकाची प्रतीपुर्ती द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम-समान वेतन लागू करावे, भविष्य निर्वाह निधी लागू करावी.