शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेच्या खोदकामामुळे महानगरात दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी पाईपलाईन होती फुटली : पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात अमृत योजनेसाठी लॉकडाऊनच्या काळात खोदकाम करण्यात आले. यात योजनेची पाईपलाईन टाकताना अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनही फुटल्या. मात्र त्या नंतर थातुरमातूर दुरुस्त करून खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला. आता पावसाळ्यात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.पाच वर्षांपूर्वी महानगरपालिका चंद्रपूर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा प्रस्ताव मंजूर केला. या योजनेंतर्गत शहरात कधीच पाणी टंचाई जाणवणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र एवढ्या वर्षांनंतरही ही योजना अद्याप पूर्णत्वास येऊ शकली नाही. अजूनही या योजनेचे काम सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी शहरातील ९० टक्के भागात खोदकाम करण्यात आले होते. यावेळी बरेच चांगले रस्ते फोडण्यात आले होते. त्यानंतर नव्याने रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. नवे रस्ते तयार होताच अमृत योजना आली. त्यामुळे पुन्हा रस्ते फुटणार, हे निश्चित होते.अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. हे करताना सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे त्या भागातील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांची ओरड झाल्यानंतर ही पाईपालाईन थातुरमातूर दुरुस्त करून मजुरांनी खोदकाम मातीने बुजवून टाकले. आता पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी अकाली पाऊस पडल्यानंतर कित्येक भागात दूषित पाणी पुरवठा झाला. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या आणखी बिकट होणार आहे.५३७ किमीची पाईपलाईनअमृत योजनेसाठी शहरभर एकूण ५३७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यापैकी बरीच कामे झाली आहे. त्यामुळे सहाजिकच एवढ्या मोठ्या परिसरात खोदकाम झाले असल्याने पाईपलाईनही बऱ्याच ठिकाणी फुटली आहे.अस्तित्वातील पाईपलाईन खिळखिळीसध्या चंद्रपूर शहराला पाणी पूरवठा करणारी पाईपलाईन ४०-५० वर्ष जुनी आहे. त्यामुळे ती खिळखिळी झाली आहे. ही पाईपलाईन कालबाह्य झाल्याचे काही वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र पाईपलाईन बदलविण्याचे सौजन्य तेव्हा मनपा प्रशासनाने दाखविले नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागात दूषित पाणी पूरवठा होतो.पालकमंत्र्यांच्या सूचनापालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपामध्ये विविध कामाचा आढावा घेतला तेव्हा अमृत योजनेच्या खोदकामामुळे शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली होती. त्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्याच्या व नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होऊ नये, यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या, हे विशेष.

टॅग्स :Waterपाणी