शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

अमृत योजनेच्या खोदकामामुळे महानगरात दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी पाईपलाईन होती फुटली : पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात अमृत योजनेसाठी लॉकडाऊनच्या काळात खोदकाम करण्यात आले. यात योजनेची पाईपलाईन टाकताना अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनही फुटल्या. मात्र त्या नंतर थातुरमातूर दुरुस्त करून खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला. आता पावसाळ्यात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.पाच वर्षांपूर्वी महानगरपालिका चंद्रपूर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा प्रस्ताव मंजूर केला. या योजनेंतर्गत शहरात कधीच पाणी टंचाई जाणवणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र एवढ्या वर्षांनंतरही ही योजना अद्याप पूर्णत्वास येऊ शकली नाही. अजूनही या योजनेचे काम सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी शहरातील ९० टक्के भागात खोदकाम करण्यात आले होते. यावेळी बरेच चांगले रस्ते फोडण्यात आले होते. त्यानंतर नव्याने रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. नवे रस्ते तयार होताच अमृत योजना आली. त्यामुळे पुन्हा रस्ते फुटणार, हे निश्चित होते.अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. हे करताना सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे त्या भागातील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांची ओरड झाल्यानंतर ही पाईपालाईन थातुरमातूर दुरुस्त करून मजुरांनी खोदकाम मातीने बुजवून टाकले. आता पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी अकाली पाऊस पडल्यानंतर कित्येक भागात दूषित पाणी पुरवठा झाला. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या आणखी बिकट होणार आहे.५३७ किमीची पाईपलाईनअमृत योजनेसाठी शहरभर एकूण ५३७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यापैकी बरीच कामे झाली आहे. त्यामुळे सहाजिकच एवढ्या मोठ्या परिसरात खोदकाम झाले असल्याने पाईपलाईनही बऱ्याच ठिकाणी फुटली आहे.अस्तित्वातील पाईपलाईन खिळखिळीसध्या चंद्रपूर शहराला पाणी पूरवठा करणारी पाईपलाईन ४०-५० वर्ष जुनी आहे. त्यामुळे ती खिळखिळी झाली आहे. ही पाईपलाईन कालबाह्य झाल्याचे काही वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र पाईपलाईन बदलविण्याचे सौजन्य तेव्हा मनपा प्रशासनाने दाखविले नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागात दूषित पाणी पूरवठा होतो.पालकमंत्र्यांच्या सूचनापालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपामध्ये विविध कामाचा आढावा घेतला तेव्हा अमृत योजनेच्या खोदकामामुळे शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली होती. त्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्याच्या व नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होऊ नये, यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या, हे विशेष.

टॅग्स :Waterपाणी