शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

अमृत योजनेच्या खोदकामामुळे महानगरात दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी पाईपलाईन होती फुटली : पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात अमृत योजनेसाठी लॉकडाऊनच्या काळात खोदकाम करण्यात आले. यात योजनेची पाईपलाईन टाकताना अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनही फुटल्या. मात्र त्या नंतर थातुरमातूर दुरुस्त करून खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा झाला. आता पावसाळ्यात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.पाच वर्षांपूर्वी महानगरपालिका चंद्रपूर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा प्रस्ताव मंजूर केला. या योजनेंतर्गत शहरात कधीच पाणी टंचाई जाणवणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र एवढ्या वर्षांनंतरही ही योजना अद्याप पूर्णत्वास येऊ शकली नाही. अजूनही या योजनेचे काम सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी शहरातील ९० टक्के भागात खोदकाम करण्यात आले होते. यावेळी बरेच चांगले रस्ते फोडण्यात आले होते. त्यानंतर नव्याने रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. नवे रस्ते तयार होताच अमृत योजना आली. त्यामुळे पुन्हा रस्ते फुटणार, हे निश्चित होते.अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने शहरात पुन्हा अमृत योजनेचे काम सुरू केले. यासाठी पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. हे करताना सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे त्या भागातील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांची ओरड झाल्यानंतर ही पाईपालाईन थातुरमातूर दुरुस्त करून मजुरांनी खोदकाम मातीने बुजवून टाकले. आता पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी अकाली पाऊस पडल्यानंतर कित्येक भागात दूषित पाणी पुरवठा झाला. भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या आणखी बिकट होणार आहे.५३७ किमीची पाईपलाईनअमृत योजनेसाठी शहरभर एकूण ५३७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यापैकी बरीच कामे झाली आहे. त्यामुळे सहाजिकच एवढ्या मोठ्या परिसरात खोदकाम झाले असल्याने पाईपलाईनही बऱ्याच ठिकाणी फुटली आहे.अस्तित्वातील पाईपलाईन खिळखिळीसध्या चंद्रपूर शहराला पाणी पूरवठा करणारी पाईपलाईन ४०-५० वर्ष जुनी आहे. त्यामुळे ती खिळखिळी झाली आहे. ही पाईपलाईन कालबाह्य झाल्याचे काही वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र पाईपलाईन बदलविण्याचे सौजन्य तेव्हा मनपा प्रशासनाने दाखविले नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागात दूषित पाणी पूरवठा होतो.पालकमंत्र्यांच्या सूचनापालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपामध्ये विविध कामाचा आढावा घेतला तेव्हा अमृत योजनेच्या खोदकामामुळे शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली होती. त्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्याच्या व नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होऊ नये, यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या, हे विशेष.

टॅग्स :Waterपाणी