शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

खडकीतील कोलाम पितात दूषित पाणी

By admin | Updated: March 4, 2016 00:59 IST

गावात जेमतेम माणसं. सगळ्याचीच हलाखीची स्थिती, शेतीच्या आधाराने जीवन जगणाऱ्या कोलामांना प्यायलाही शुद्ध पाणी नाही.

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन : नागरिकांना विविध आजारांची लागणशंकर चव्हाण जिवतीगावात जेमतेम माणसं. सगळ्याचीच हलाखीची स्थिती, शेतीच्या आधाराने जीवन जगणाऱ्या कोलामांना प्यायलाही शुद्ध पाणी नाही. दूरध्वनी सेवा तर सोडा साधी बाजारपेठेत जायला रस्त्याचीही सोय नाही. आरोग्यांची काळजी घेणारे कर्मचारीही गावात कधी येत नाही. ही व्यथा आहे, खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील खडकी गुड्याची.स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे निघून गेली. सत्ता बदलली लोकप्रतिनिधी बदलले. पण गुड्यातील समस्या सुटल्या नाही. आजही कोलामांना पाणी असूनही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे दूषित पाणी प्यावे लागत असल्याची वास्तविकता लोकमतने आॅन द स्पॉट भेट देऊन समोर आणली आहे.केवळ १२ घरांची वस्ती. जेमतेम ५०-५५ जण गुड्यात वास्तव्यास असून संपूर्ण कुटुंबच दारिद्र्य रेषेखाली हलाखीचे जीवन जगत आहे. या छोट्याशा गुड्यात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. दहावीपर्यंत चार तर बारावीपर्यंत एका मुलीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. कर्णू उत्तम मडावी हा युवक सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलीस म्हणून लागला आहे. तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आणि खडकी रायपूर असे ग्रामपंचायतीचे नाव असले तरी खडकीचा विकास मात्र अजून झालेला दिसत नाही. सुरुवातीला ७० घराची वस्ती या गुड्यात होती. पिढ्यानपिढ्या एकोप्याने राहणारा समाज समस्याला कंटाळून विखुरला गेला. आजघडीला या गुड्यात फक्त १२ घराची वस्ती आहे. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही गावात जायला धड रस्ता नाही. वाहन गावात कधी आले नाही. गुड्यातील लोकांना येण्याजाण्याकरिता सोयीचे व्हावे, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याची कामे केली. पण काही दिवसात रस्त्याची वाट लागली आहे. विहिरीची संरक्षण भिंत पडलीयेथील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, यासाठी जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत विहिरीचे बांधकाम झाले. संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार विहिरीचे काम काळ्या रेतीने थातूर-मातूर करुन मोकळे झाले. अनेक वेळा तक्रारी दिल्या. मात्र कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे वर्षभरातच विहिरीची संरक्षण भिंत पडली. आजही ती तशीच असून काही ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यावर नागरिकांनी बचावासाठी दगडाचे ढिगळ बसवल्याचे दिसून आले. ही विहीर नागरिकांसाठी धोकादायकच आहे. पिण्याचे पाणीही झाले लालविहीर धोकादायक असतानाही त्याच विहिरीवरुन पाणी पिण्यास न्यावे लागते. कारण शाळेसमोर असलेला हातपंप दोन वर्षापूर्वी बंद पडला आहे. अनेकवेळा तक्रारी केल्या. पण कुणीच लक्ष दिले नाही. विहीर धोकादायक तर आहेच; पण त्यातील पाणीही आता खराब झाले आहे. विहीर नाल्यालगत असल्याने काही ठराविक दिवसात पाण्याचा उपसा व नियमित ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. मात्र असे होत नसल्याने नागरिकांना लाल पाणी प्यावे लागते.