शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम तीन महिन्यांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST

केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहनधारक हैराण । तातडीने बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दोन मोठ्या कंपन्याना होते. यापैकी उमेरड- चिमूर मार्गचे काम स्थितीत सुरू आहे. परंतु, चिमूर-वरोरा मार्गाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे. चिमूर- वरोरा हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला. या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. पण मागील दीड वर्षाच्या काळात या मार्गाची एक बाजूही तयार करण्यात संबधित यंत्रणेला यश आले नाही. बांधकाम सुरू असताना त्यावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकााां मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावर पसरविण्यात आलेल्या गिट्टीमुळे दररोज अपघात घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेकांना अपंगत्व आले. मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट वारंवार विविध कंपन्यांना हस्तांतरीत केल्या जाते. मागील तीन महिन्यांच्या काळापासून बांधकाम प्रक्रिया पूर्णत: ठप्प आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. शिवाय लोकप्रतिनिधीही बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहनधारक व परिसरातील विविध गावांतील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. उमरेड- चिमूर -वरोरा हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मार्गाचे चौपदरीकरण व अन्य कामे पूर्ण झाली असती तर विकासाला चालना मिळाली असती. पण मागील तीन महिन्यांपासून बांधकाम जैसे थे आहे. त्यामुळे महामार्गाच्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता आशिष आवळे यांच्याशी संपर्क साधला परंतु होऊ शकला नाही.रुग्णांसाठी धोकादायकचिमूर तालुक्यात आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना चंद्रपूर व नागपूर येथे दाखल करावे लगाते. गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या मार्गावर जागोजागी खड्डे असल्यामुळे रुग्णालयात पोहोचताना संकटांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने चौपदीकरणाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग