शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारणार

By admin | Updated: November 15, 2014 22:44 IST

आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते

गांधी चौकात जनसागर उसळला : हंसराज अहीर यांचे सत्काराला उत्तरचंद्रपूर : आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी सोपविवली. त्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांना या विभागामार्फत कसा लाभ देता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ना.हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा गांधी चौकात भव्य सत्कार करणार आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार राजू तोडसाम, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय राऊत, राजेश मून, राजेंद्र अडपेवार, चंद्रकांत गुंडावार आदी उपस्थित होते.मतदारांनी चार वेळा लोकसभेत पाठविले. त्यामुळेच मंत्रीपदाची संधी मिळाली. मला मिळालेल्या मंत्रीपदाचे श्रेय हे माझे नाही तर, मतदारांचे आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नागरिकांनी काँग्रेसचे सरकार उलथवून भाजपाकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे नागरिकांकडून माझ्या अपेक्षा वाढत्या आहेत. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगर भाजपातर्फे पुष्पहार घालुन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महानगररातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)