शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारणार

By admin | Updated: November 15, 2014 22:44 IST

आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते

गांधी चौकात जनसागर उसळला : हंसराज अहीर यांचे सत्काराला उत्तरचंद्रपूर : आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी सोपविवली. त्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांना या विभागामार्फत कसा लाभ देता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ना.हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा गांधी चौकात भव्य सत्कार करणार आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार राजू तोडसाम, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय राऊत, राजेश मून, राजेंद्र अडपेवार, चंद्रकांत गुंडावार आदी उपस्थित होते.मतदारांनी चार वेळा लोकसभेत पाठविले. त्यामुळेच मंत्रीपदाची संधी मिळाली. मला मिळालेल्या मंत्रीपदाचे श्रेय हे माझे नाही तर, मतदारांचे आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नागरिकांनी काँग्रेसचे सरकार उलथवून भाजपाकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे नागरिकांकडून माझ्या अपेक्षा वाढत्या आहेत. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगर भाजपातर्फे पुष्पहार घालुन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महानगररातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)