शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारणार

By admin | Updated: November 15, 2014 22:44 IST

आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते

गांधी चौकात जनसागर उसळला : हंसराज अहीर यांचे सत्काराला उत्तरचंद्रपूर : आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी सोपविवली. त्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांना या विभागामार्फत कसा लाभ देता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ना.हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा गांधी चौकात भव्य सत्कार करणार आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार राजू तोडसाम, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय राऊत, राजेश मून, राजेंद्र अडपेवार, चंद्रकांत गुंडावार आदी उपस्थित होते.मतदारांनी चार वेळा लोकसभेत पाठविले. त्यामुळेच मंत्रीपदाची संधी मिळाली. मला मिळालेल्या मंत्रीपदाचे श्रेय हे माझे नाही तर, मतदारांचे आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नागरिकांनी काँग्रेसचे सरकार उलथवून भाजपाकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे नागरिकांकडून माझ्या अपेक्षा वाढत्या आहेत. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगर भाजपातर्फे पुष्पहार घालुन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महानगररातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)