शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
3
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
4
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
5
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
6
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
7
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
8
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
9
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
10
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
11
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
12
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
13
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
14
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
15
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
16
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
17
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
18
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
19
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
20
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडलेलेच

By admin | Updated: February 26, 2016 01:08 IST

महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे.

आवागमनाचा एकमेव मार्ग : अभियंता, कंत्राटदाराचे दुर्लक्षराजुरा : महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यातच सहा महिन्यांपासून बांधकाम पूर्णपणे ठप्प आहे. याच पद्धतीने बांधकाम सुरू राहिल्यास पुन्हा दोन-तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा फटका व त्रास सामान्य नागरिकांना व वाहन चालकांना सोसावा करावा लागत आहे.माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अथक प्रयत्नाने उड्डाण पुलाची मंजुरी व बांधकाम सुरू झाले होते. या बांधकामाचा खर्च महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून होत आहे. नागपूरपासून दक्षिणकडील राज्यात आवागमनाचा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारो ट्रक या मार्गाने जाणे-येणे करतात. मात्र या मार्गावरील रेल्वे गेट १० मिनीटात बंद होते. गेट उघण्यासाठी २०- २५ मिनीटे वाट पाहावी लागते. त्यामुळे आम जनतेस व वाहन चालकांना गेट उघडण्याची वाट पाहत त्रास सहन करावा लागत आहे.तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. दोन वर्षांत पुलाचे बांधकाम करण्याचा करार करण्यात आला होता. परंतु अद्यापही बांधकाम अपूर्ण आहे. या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्याची देखरेख आहे. कंत्राटदाराकडून वेळेवर बांधकाम करून घेण्याची जबाबदारी अभियंत्याची आहे. बांधकामाचा कालावधी पाहून अभियंता व कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. बांधकामाचा जागेवर विवरण फलक लावणे आवश्यक आहे. तशी तरतुद नियमात आहे. परंतु अभियंता व कंत्राटदार आपला बचाव करण्यासाठी फलक लावणे टाळत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. याच पद्धतीचे बांधकाम सुरू राहिल्यास उड्डाण पूल पूर्ण होण्यास दोन-तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)