शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडलेलेच

By admin | Updated: February 26, 2016 01:08 IST

महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे.

आवागमनाचा एकमेव मार्ग : अभियंता, कंत्राटदाराचे दुर्लक्षराजुरा : महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यातच सहा महिन्यांपासून बांधकाम पूर्णपणे ठप्प आहे. याच पद्धतीने बांधकाम सुरू राहिल्यास पुन्हा दोन-तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा फटका व त्रास सामान्य नागरिकांना व वाहन चालकांना सोसावा करावा लागत आहे.माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अथक प्रयत्नाने उड्डाण पुलाची मंजुरी व बांधकाम सुरू झाले होते. या बांधकामाचा खर्च महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून होत आहे. नागपूरपासून दक्षिणकडील राज्यात आवागमनाचा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारो ट्रक या मार्गाने जाणे-येणे करतात. मात्र या मार्गावरील रेल्वे गेट १० मिनीटात बंद होते. गेट उघण्यासाठी २०- २५ मिनीटे वाट पाहावी लागते. त्यामुळे आम जनतेस व वाहन चालकांना गेट उघडण्याची वाट पाहत त्रास सहन करावा लागत आहे.तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. दोन वर्षांत पुलाचे बांधकाम करण्याचा करार करण्यात आला होता. परंतु अद्यापही बांधकाम अपूर्ण आहे. या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्याची देखरेख आहे. कंत्राटदाराकडून वेळेवर बांधकाम करून घेण्याची जबाबदारी अभियंत्याची आहे. बांधकामाचा कालावधी पाहून अभियंता व कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. बांधकामाचा जागेवर विवरण फलक लावणे आवश्यक आहे. तशी तरतुद नियमात आहे. परंतु अभियंता व कंत्राटदार आपला बचाव करण्यासाठी फलक लावणे टाळत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. याच पद्धतीचे बांधकाम सुरू राहिल्यास उड्डाण पूल पूर्ण होण्यास दोन-तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)