शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम

By admin | Updated: July 17, 2014 00:01 IST

तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

चौकशीची मागणी: शासनाला लाखो रुपयांचा चूनासावली : तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.२०१३-१४ या वित्तीय वर्षात २५ एप्रिल २०१३ रोजी बंधारा बांधण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पारित केला. त्यानुसार सहा लाख ६८ हजार ३५० रुपये अंदाजपत्रक असलेला बंधारा जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने मंजूर केले. मात्र त्या बंधाऱ्याची गरज नसतांनाही २०० मीटर अंतरावर आधीच दोन बंधारे बांधण्यात आले. तिसऱ्या बंधाऱ्याला मंजुरी देण्यात येऊन त्याचे बांधकामही पूर्ण झाले. एवढेच नाही तर, सुरेश वसंत भांडेकर नामक व्यक्तीच्या नावाने सदर बंधारा बांधकामाची निविदा ग्रामपंचायतीने मंजूर कली. परंतु त्याच्याकडे कच्चा माल पुरविण्याचे कोणतेही साधन नसतांना बंधारा बांधकामाची मंजूरी दिलीच कशी? असा गावकऱ्यांचा आरोप आहे. शिवाय बंधारा पूर्ण होऊन त्याच्या बिलाची उचलही करण्यात आली. परंतु अजुनही बंधाऱ्याला दरवाजे लावण्यात आलेले नाही. सदर बंधारा गरज म्हणून नाही तर केवळ पैसे कमविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे.ज्या परिसरात बंधारा बांधण्यात आला त्या परिसरातील एकाही शेतकऱ्याची परवानगी घेण्यात आली नाही किंवा त्या शेतकऱ्यांना सदर बंधाऱ्यापासून कोणतेही सिंचन होणार नसल्यामुळे या बंधाऱ्याची आवश्यकता काय. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बंधाऱ्याचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)