शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

संविधान जन्माला आले, ही महत्त्वाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:17 IST

१९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला.

ठळक मुद्देराजन खान : राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला. आज कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत आपण सुखी नाही. शिक्षणात अक्कल नाही, खरे आरोग्य नाही. मातीत राबणारा मरतो आहे, हे दुर्दैव आहे. निवडणुका हिंदू अन् मुसलमान अशा होतात. सत्तर वर्षात आपण भारतीय होऊ शकलो नाही. हिंदूराष्ट्र कशासाठी, भारत राष्ट्र कुणी मागतो का? माझं देशावर प्रेम आहे. या देशात संविधान जन्माला आले, ही अत्यंत महत्त्वाची घटना. पण संविधान पाळलं जात नाही, हे दु:ख आहे. धर्मामधला पैसा काढा. श्रद्धा मनात पाहिजे. जे लोक जात, पंथ पाळतात, ते संविधानविरोधी लोक होत, असे सडेतोडपणे मत संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.सूर्यांस साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी विचारपीठावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार, सूर्यांशचे अध्यक्ष कवी इरफान शेख, स्वागताध्यक्ष तनुजा बोडाले, कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड, संजय वैद्य, सीमा भसारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. शोभणे म्हणाले, छोटी संमेलने व्हावीत, याचा मी पाईक आहे. असे सांगून सूर्यांश टीमचे स्वागत केले. अशोक पवारांनी धर्माचे धर्मांतर इतके वेळा व्हावे की माणूस मोठा व धर्म लहान व्हावा. आपण भयानक धावत आहोत. पुस्तकं निघाली पाहिजेत. त्यातून माणसं उभी राहतात.संचालन उपाध्यक्ष सीमा भसारकरांनी तर आभार सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. याप्रसंगी सचिव प्रदीप देशमुख, प्राचार्य डॉ. इंगोले, निता कोंतमवार, गीता रायपुरे, कोषाध्यक्ष रंगनाथ रायपुरे, प्रभाकर धोपटे, किशोर तेलतुंबडे, संगिता पिजदूरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. विजय सोरते, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, विवेक पत्तीवार, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.