शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

संविधान जन्माला आले, ही महत्त्वाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:17 IST

१९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला.

ठळक मुद्देराजन खान : राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला. आज कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत आपण सुखी नाही. शिक्षणात अक्कल नाही, खरे आरोग्य नाही. मातीत राबणारा मरतो आहे, हे दुर्दैव आहे. निवडणुका हिंदू अन् मुसलमान अशा होतात. सत्तर वर्षात आपण भारतीय होऊ शकलो नाही. हिंदूराष्ट्र कशासाठी, भारत राष्ट्र कुणी मागतो का? माझं देशावर प्रेम आहे. या देशात संविधान जन्माला आले, ही अत्यंत महत्त्वाची घटना. पण संविधान पाळलं जात नाही, हे दु:ख आहे. धर्मामधला पैसा काढा. श्रद्धा मनात पाहिजे. जे लोक जात, पंथ पाळतात, ते संविधानविरोधी लोक होत, असे सडेतोडपणे मत संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.सूर्यांस साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी विचारपीठावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार, सूर्यांशचे अध्यक्ष कवी इरफान शेख, स्वागताध्यक्ष तनुजा बोडाले, कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड, संजय वैद्य, सीमा भसारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. शोभणे म्हणाले, छोटी संमेलने व्हावीत, याचा मी पाईक आहे. असे सांगून सूर्यांश टीमचे स्वागत केले. अशोक पवारांनी धर्माचे धर्मांतर इतके वेळा व्हावे की माणूस मोठा व धर्म लहान व्हावा. आपण भयानक धावत आहोत. पुस्तकं निघाली पाहिजेत. त्यातून माणसं उभी राहतात.संचालन उपाध्यक्ष सीमा भसारकरांनी तर आभार सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. याप्रसंगी सचिव प्रदीप देशमुख, प्राचार्य डॉ. इंगोले, निता कोंतमवार, गीता रायपुरे, कोषाध्यक्ष रंगनाथ रायपुरे, प्रभाकर धोपटे, किशोर तेलतुंबडे, संगिता पिजदूरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. विजय सोरते, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, विवेक पत्तीवार, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.