शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जन्माला आले, ही महत्त्वाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:17 IST

१९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला.

ठळक मुद्देराजन खान : राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला. आज कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत आपण सुखी नाही. शिक्षणात अक्कल नाही, खरे आरोग्य नाही. मातीत राबणारा मरतो आहे, हे दुर्दैव आहे. निवडणुका हिंदू अन् मुसलमान अशा होतात. सत्तर वर्षात आपण भारतीय होऊ शकलो नाही. हिंदूराष्ट्र कशासाठी, भारत राष्ट्र कुणी मागतो का? माझं देशावर प्रेम आहे. या देशात संविधान जन्माला आले, ही अत्यंत महत्त्वाची घटना. पण संविधान पाळलं जात नाही, हे दु:ख आहे. धर्मामधला पैसा काढा. श्रद्धा मनात पाहिजे. जे लोक जात, पंथ पाळतात, ते संविधानविरोधी लोक होत, असे सडेतोडपणे मत संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.सूर्यांस साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी विचारपीठावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार, सूर्यांशचे अध्यक्ष कवी इरफान शेख, स्वागताध्यक्ष तनुजा बोडाले, कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड, संजय वैद्य, सीमा भसारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. शोभणे म्हणाले, छोटी संमेलने व्हावीत, याचा मी पाईक आहे. असे सांगून सूर्यांश टीमचे स्वागत केले. अशोक पवारांनी धर्माचे धर्मांतर इतके वेळा व्हावे की माणूस मोठा व धर्म लहान व्हावा. आपण भयानक धावत आहोत. पुस्तकं निघाली पाहिजेत. त्यातून माणसं उभी राहतात.संचालन उपाध्यक्ष सीमा भसारकरांनी तर आभार सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. याप्रसंगी सचिव प्रदीप देशमुख, प्राचार्य डॉ. इंगोले, निता कोंतमवार, गीता रायपुरे, कोषाध्यक्ष रंगनाथ रायपुरे, प्रभाकर धोपटे, किशोर तेलतुंबडे, संगिता पिजदूरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. विजय सोरते, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, विवेक पत्तीवार, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.