शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फायद्यातोट्याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:41 IST

मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : माध्यमांसाठी सायबर जागृती कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी. घरातील प्रत्येक व्यवहार आॅनलाईन होत आहे. ही सुविधा आहे. मात्र सुविधा घेताना फायद्यातोट्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सायबर सेलमार्फत आयोजित कार्यशाळेमध्ये दोन तासांच्या विचार मंथनात जनतेला याबाबत जागरुक करण्याचे माध्यमांचे दायित्व त्यांनी पार पाडावे, असे आवाहनही करण्यात आले.महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र अंर्तगत पत्रकार आणि माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्रभर सुरु आहे. चंद्रपूर जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी सायबर गुन्हे, सायबर विश्व, सायबर हॅकर, सायबर तंत्रज्ञान याविषयी विविध सादरीकरणातून माहिती जाणून घेतली. या विषयाबद्दल आपल्या शंकांचे समाधान करवून घेतले. तसेच सायबर कायद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहितीही घेतली.कार्यशाळेत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक के.बी.शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे व मुजावर अली यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, याची उदाहरणांसह माहिती दिली. ते म्हणाले, इंटरनेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात आपली वैयक्तिक माहिती कुठे ना कुठे मोबाईलवर अ‍ॅप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून टाकत असतो. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. कुणी कितीही सांगितले तरी ही माहिती पूर्णत: सुरक्षित असतेच असे नव्हे. आता इंटरनेट आॅफ थिंग्सचा जमाना आहे. अनेक घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये इंटरनेटची सोय आहे. याठिकाणीदेखील काही माहिती टाकताना आपण काळजी घेतली पाहिजे.फेसबुकसारख्या मायाजाळात तरुण मुलं एवढेच नव्हेतर सुशिक्षित रोज फसत आहेत. त्यामुळे सावध राहणे हेच यामध्ये महत्वाचे आहे. त्यासाठी नेट वापरणाºया प्रत्येकाला काही मुलभूत बाबींची माहिती माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारच्या स्तंभांना, लेखांना जागा द्यावी. सोप्या भाषेत याबाबतचे मार्गदर्शन करावे, अशी विनंती यावेळी सायबर सेलच्या अधिकाºयांनी केली.मुजावर अली यांनी चंद्रपूर व परिसरातील सायबर क्राईममधील घटनाक्रमांचे उदाहरण देत आपल्या अवतीभवती सुरु असलेल्या फसवणुकीच्या अनेक घटनाक्रमांना उजागर केले. कार्यशाळेला जिल्हाभरातील विविध माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते.सावधानता बाळगाकाही दिवसांपासून बँकेच्या एटीएममधून फसवणूक करून पैसे काढण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ग्राहकाने सावधानता बाळगायची आहे. परंतु बँकेचीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, ग्राहकाची चूक नसेल तर नियमाप्रमाणे विशिष्ट दिवसात त्याला पैसे मिळणे आवश्यक आहे, असेही यावेळी विकास मुंडे यांनी सांगितले.