शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरूण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे, मात्र येथील जनता गरीब राहिली.

ठळक मुद्दे नितीन गडकरी : बल्लारपूर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून प्रदूषणविरहित उत्पादन तयार करता येते. शिवाय त्यातून मोठा रोजगार उभा राहतो. अगरबत्तीच्या काड्या आणि आईसक्रीमचे चमचेही आम्हाला विदेशातून आयात करावे लागतात, हे दुर्दैव आहे. या परिसरात उत्तम बांबू आहे. त्यामुळे येथे ‘बांबू क्लस्टर’ तयार व्हावे. तसेच हा प्रदेश धान उत्पादनातही अग्रेसर असल्याने तणसापासून बायोडिझेलचे शंभर कारखाने उभे व्हावेत. या दोन्ही प्रकल्पासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी मी द्यायला तयार आहे. गडचिरोली-चंद्रपूर हे ‘बायो एव्हिएशन फ्युल’चे हब होऊ शकते. यातून येत्या काळात ३० हजार तरूणांना रोजगार मिळेल, अशी आशा भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम कार्यकर्ता, नेता आणि कार्यक्षम मंत्री म्हणून जनतेच्या हृदयात विशेष स्थान प्राप्त केले आहे. रचनात्मक वृत्ती ठेवणाऱ्या या समाज समर्पित नेत्याला मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर शहरात आयोजित जाहीर सभेत ना. गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर उमेदवार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, अ‍ॅड. संजय धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती होती.देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरूण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे, मात्र येथील जनता गरीब राहिली. कारण ६२ वर्षे या देशाला दूरदृष्टी असलेला नेता लाभला नाही, असा आरोपही गडकरी यांनी केला.काँग्रेसच्या प्रदीर्घ काळात चुकीच्या रूळावर गेलेली देशाची व राज्याची गाडी अवघ्या पाच वर्षात योग्य मार्गावर येणे शक्य नाही. परंतु, आम्ही वेगाने या गाडीला रूळावर आणत आहोत. कापसापासून सुत, सुतापासून तयार कपडे आणि त्यानंतर त्याचे विपणन करण्याची ४० कोटीची योजना असून, त्यात २० कोटी सानुग्रह निधी दिला जाईल. १० कोटी उद्योजकांनी गुंतवायचे आहेत. तर १० कोटींचे कर्ज दिल्या जाणार आहे. अशा पद्धतीचे १३ क्लस्टर मंजूर करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. संचालन समीर केने यांनी केले.विकासात चंद्रपूर जिल्हा परिपूर्ण करणार - सुधीर मुनगंटीवारयावेळी बोलताना उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्याात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेसमोर ठेवली. आजवर चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी कधी नव्हे इतका निधी आपण मंजूर केला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात भरीव असा विकास झाला असून रोजगार व स्वयंरोजगार, कृषी विकास, सिंचन, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, महिला व बालविकास, विद्यार्थी विकास असा सर्वस्पर्शी विकास आपण केला आहे. मिशन शक्ती, मिशन शौर्य, मिशन सेवा, मिशन मंथन अशा विविध मिशनच्या माध्यमातून या जिल्हयातील युवकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास या जिल्हयाला, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :ballarpur-acबल्लारपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार