शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरूण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे, मात्र येथील जनता गरीब राहिली.

ठळक मुद्दे नितीन गडकरी : बल्लारपूर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून प्रदूषणविरहित उत्पादन तयार करता येते. शिवाय त्यातून मोठा रोजगार उभा राहतो. अगरबत्तीच्या काड्या आणि आईसक्रीमचे चमचेही आम्हाला विदेशातून आयात करावे लागतात, हे दुर्दैव आहे. या परिसरात उत्तम बांबू आहे. त्यामुळे येथे ‘बांबू क्लस्टर’ तयार व्हावे. तसेच हा प्रदेश धान उत्पादनातही अग्रेसर असल्याने तणसापासून बायोडिझेलचे शंभर कारखाने उभे व्हावेत. या दोन्ही प्रकल्पासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी मी द्यायला तयार आहे. गडचिरोली-चंद्रपूर हे ‘बायो एव्हिएशन फ्युल’चे हब होऊ शकते. यातून येत्या काळात ३० हजार तरूणांना रोजगार मिळेल, अशी आशा भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम कार्यकर्ता, नेता आणि कार्यक्षम मंत्री म्हणून जनतेच्या हृदयात विशेष स्थान प्राप्त केले आहे. रचनात्मक वृत्ती ठेवणाऱ्या या समाज समर्पित नेत्याला मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर शहरात आयोजित जाहीर सभेत ना. गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर उमेदवार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, अ‍ॅड. संजय धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती होती.देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरूण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे, मात्र येथील जनता गरीब राहिली. कारण ६२ वर्षे या देशाला दूरदृष्टी असलेला नेता लाभला नाही, असा आरोपही गडकरी यांनी केला.काँग्रेसच्या प्रदीर्घ काळात चुकीच्या रूळावर गेलेली देशाची व राज्याची गाडी अवघ्या पाच वर्षात योग्य मार्गावर येणे शक्य नाही. परंतु, आम्ही वेगाने या गाडीला रूळावर आणत आहोत. कापसापासून सुत, सुतापासून तयार कपडे आणि त्यानंतर त्याचे विपणन करण्याची ४० कोटीची योजना असून, त्यात २० कोटी सानुग्रह निधी दिला जाईल. १० कोटी उद्योजकांनी गुंतवायचे आहेत. तर १० कोटींचे कर्ज दिल्या जाणार आहे. अशा पद्धतीचे १३ क्लस्टर मंजूर करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. संचालन समीर केने यांनी केले.विकासात चंद्रपूर जिल्हा परिपूर्ण करणार - सुधीर मुनगंटीवारयावेळी बोलताना उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्याात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेसमोर ठेवली. आजवर चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी कधी नव्हे इतका निधी आपण मंजूर केला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात भरीव असा विकास झाला असून रोजगार व स्वयंरोजगार, कृषी विकास, सिंचन, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, महिला व बालविकास, विद्यार्थी विकास असा सर्वस्पर्शी विकास आपण केला आहे. मिशन शक्ती, मिशन शौर्य, मिशन सेवा, मिशन मंथन अशा विविध मिशनच्या माध्यमातून या जिल्हयातील युवकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास या जिल्हयाला, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :ballarpur-acबल्लारपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार