शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

काँग्रेसची गरिबी हटाओ घोषणा म्हणजे एप्रिल फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:11 IST

कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : गडचांदूर येथे भाजपची प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.यावेळी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, विधान परिषदेचे आमदार अनिल सोले, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, अशोक जिवतोडे, रिपाइं (आ.) चे सिद्धार्थ पथाडे, डॉ. मंगेश गुलवाडे, न. प. उपाध्यक्ष आनंदी मोरे, नितीन पिपरे, सतिश उपलेंचीवार, नारायण हिवरकर, केशव गिरीमाजी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक नवनवीन योजना राबविण्यात आल्या. विविध योजनेचे गरिबांच्या खात्यावर डिबीटीद्वारे थेट पैसे जाऊ लागले. त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसला. प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर, शौचालये, गॅस आता उपलब्ध होऊ लागले आहे. मुद्रा लोनमुळे बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागला. दळणवळणाचे महत्व लक्षात ठेवून या देशात महामार्गाचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी यांच्या काळात झाले. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळणार, असा दावाही त्यांनी केला आहे. सभेला राजुरा कोरपना जिवती क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.पेंडाल उडालामुख्यमंत्र्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. दरम्यान, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळ आले. यात पेंडालचा समोरील भाग उडाला. यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनी यानंतरच्या भाषणात पेंडाल जसा हव्याने उडाला, तसे कॉंग्रेसला पण हवेत उडवा, असा टोमणा लगावला आणि एकच हशा पिकला.मुख्यमंत्री अडीच तास उशिरामुख्यमंत्र्यांची नियोजित सभा दुपारी १ वाजता होती. परंतु मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा पोहचल्याने उपस्थितांना भर उन्हात ताटकळत राहावे लागले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूर