शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

काँग्रेसची गरिबी हटाओ घोषणा म्हणजे एप्रिल फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:11 IST

कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : गडचांदूर येथे भाजपची प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.यावेळी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, विधान परिषदेचे आमदार अनिल सोले, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, अशोक जिवतोडे, रिपाइं (आ.) चे सिद्धार्थ पथाडे, डॉ. मंगेश गुलवाडे, न. प. उपाध्यक्ष आनंदी मोरे, नितीन पिपरे, सतिश उपलेंचीवार, नारायण हिवरकर, केशव गिरीमाजी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक नवनवीन योजना राबविण्यात आल्या. विविध योजनेचे गरिबांच्या खात्यावर डिबीटीद्वारे थेट पैसे जाऊ लागले. त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसला. प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर, शौचालये, गॅस आता उपलब्ध होऊ लागले आहे. मुद्रा लोनमुळे बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागला. दळणवळणाचे महत्व लक्षात ठेवून या देशात महामार्गाचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी यांच्या काळात झाले. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळणार, असा दावाही त्यांनी केला आहे. सभेला राजुरा कोरपना जिवती क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.पेंडाल उडालामुख्यमंत्र्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. दरम्यान, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळ आले. यात पेंडालचा समोरील भाग उडाला. यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनी यानंतरच्या भाषणात पेंडाल जसा हव्याने उडाला, तसे कॉंग्रेसला पण हवेत उडवा, असा टोमणा लगावला आणि एकच हशा पिकला.मुख्यमंत्री अडीच तास उशिरामुख्यमंत्र्यांची नियोजित सभा दुपारी १ वाजता होती. परंतु मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा पोहचल्याने उपस्थितांना भर उन्हात ताटकळत राहावे लागले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूर