शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर

By admin | Updated: August 2, 2016 01:41 IST

बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली

दिवसभराचे धरणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा न बदलल्यास आंदोलनाचा इशारा चंद्रपूर : बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली प्रस्तावित जागा सर्व दृष्टीने अयोग्य आहे. ही जागा बदलून सोईच्या जागेवर हे महाविद्यालय उभारले जावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा एनएसयुआय आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर धरणे दिले. या जागेचा फेरविचार झाला नाही तर, भविष्यात आंदोलन उभाऱ्याचा इशाराही यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आला. चंद्रपूर जिल्हा एनएसयुआयने १ आॅगस्टला स्थानिक गांधीचौकात धरणा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सकााळी ११ वाजतापासून या धरण्याला प्रारंभ झाला. एनएसयुआयच्या आवाहनावरून पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला. भर पावसातही या मागणीसाठी नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून या संदर्भातील एक निवेदन सादर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या मागणीसाठी निवदेन पाठवून आपल्या भावना कळविण्यात आल्या. पागलबाबा नगरजवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्तावित केलेली जागा सर्व दृष्टीने गैरसोईची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या जागेलगतच महानगर पालिकेचा डंपिग यार्ड असल्याने आणि काही अंतरावर एमईएल प्रकल्प असल्याने या परिसरात मोठ्या प्रमावर प्रदुषण आणि दुर्गंधी असते. त्यामुळे ही जागा रूग्णांच्या दृष्टीने कशी योग्य ठरू शकते, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिकांच्या आरोग्याचा तर विचार करा - पुगलिया या संदर्भात धरणास्थळी दुपारी माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, वाहतूक, दळणवळण, स्वच्छता, प्रदुषण या सर्व दृष्टीने पागलनगर परिसरातील जागा अयोग्य आहे. तरीही या जागेसाठी सरकारचा हेका कशासाठी आहे, हे समजायला मार्ग नाही. निदान नागरिकांच्या आरोग्यचा आणि गैरसोईचा विचार करून तर जागा ठरवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नरेश पुगलिया म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अन्य जागा निश्चित करण्याची गरज आहे. ही जागा उंचसखल असल्याने ती समतल करण्यासाठी ६५ कोटी रूपयांचा अनाठायी खर्च होणार आहे. प्रदुषण आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य येथे धोक्यात आहेच, सोबतच, जवळच जुनोना जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा वावर या परिसरात असतो. त्यामुळे रात्री येणाऱ्या रूग्णांच्या दृष्टीने पूर्णत: गैरसोईचे आहे. ही जागा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. प्रस्तावित जागेचे भौगोलिक क्षेत्रही चांगले नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून हे अंतर अधिक असल्याने ग्रामीण नागरिकांची गैरसोयच होणार आहे. यामुळे सरकारने या बाबींचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला कव्वाल मसीज शोला, गजानन गावंडे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, जिल्हा उपाध्यक्ष काशिफ अली, दुर्गेश चौबे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव माजी नगराध्यक्ष डॉ.सुरेश महाकुलकर यांच्यासह नगरसेवक, तसेच काँंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.