शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘त्या’ रेल्वेगेटविरोधात काँग्रेस छेडणार तीव्र आंदोलन

By admin | Updated: April 8, 2016 00:55 IST

केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे.

अनेकदा गेट बंद : पाच हजार विद्यार्थ्यांचे जाणेयेणे प्रभावितराजुरा : केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे. मात्र या गेटमुळे पाच हजार विद्यार्थी वेठीस धरले जात आहे. या विरोधात राजुरा तालुका युवक काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या रेल्वे गेटच्या पुढे दहा शाळा महाविद्यालय असून पाच हजार विद्यार्थी दररोज ये-जा करतात. नेमके परीक्षेच्या वेळेलाच गेट बंद असतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत दहा ते पंधरा वेळा गेट बंद करण्यात येते. कधी गाडी अर्धा- अर्धा तास येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक ताटकळत बसतात. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून दिवसा गाड्या चालऊ नका, चालवायच्या असले तर उड्डानपूल बांधा. करोडो रुपये नफा कमविणाऱ्या या सिमेंट कंपन्या शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. रेल्वेच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलु ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की या रेल्वेगेटमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता गोंडवाना विद्यापीठाचा पेपर होता. नेमके ८.५० वाजता गेट बंद झाले. कोणतीच गाडी आली नाही. ९.१० वाजता गेट सुरु केले. गेटवरील नोकरी करणारे मुजोरी करीत असून हा प्रकार न थांबविल्यास पाच हजार विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलु ठाकरे यांनी दिला आहे. मागील अनेक वर्षापासून गेटचा प्रश्न प्रलंबित असून गेटजवळ मोठमोठे खड्डे पडले आहे. दोन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हे रेल्वे गेट नागरिकांची डोकेदुखी ठरत असून १५ दिवसात उचित कार्यवाही न केल्यास सिमेंटच्या गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)