शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आर्णीमध्ये काँग्रेस करणार ‘चाय की चर्चा’

By admin | Updated: June 12, 2016 00:41 IST

यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (तालुका आर्णी) येथे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी....

१६ जूनला आयोजन : मोदींना घेरण्याची तयारीचंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (तालुका आर्णी) येथे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (चाय पे चर्चा) हा कार्यक्रम करून शेतकऱ्यांच्या समस्या आणि उन्नतीवर चर्चा घडवून आणली होती. मात्र दोन वर्षात शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने कसलीही आखणी झाली नाही, उलट आत्महत्या वाढल्या. त्यामुळे पंतप्रधानांच्या आश्वासनांवर उत्तर म्हणून काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.१६ जूनला आर्णी येथील बालाजी जिनींगच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होऊ घातला असून त्यातून पंतप्रधानांना त्यांनी दोन वर्षांपूर्वी तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जाणर असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेतून दिली. शिवाजीराव मोघे म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम ठेवला होता. शेतकऱ्यांना दिलेल्या वारेमाप आश्वासनांची भरपूर प्रसिद्धी करून त्यांनी सत्ता मिळविली. ते पंतप्रधानही झाले. मात्र त्याच गावातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या त्यांना थांबविता आल्या नाहीत. यावरून त्यांच्या आश्वासनातील फोलपणा स्पष्ट होतो. सत्तेत येताच शेतकऱ्यांना ते उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देणार होते. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. कापसाचा दर फक्त ५० रूपयांनी वाढविण्यात आला. शेतकऱ्यांना अल्पदरात कर्ज देण्याचीही घोषणा होती. मात्र शेतकरी आजही कर्जासाठी बँकाच्या दारात दिसत आहे. स्व.राजीव गांधी यांच्या नावाने असलेल्या जीवनदायी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. निवडणुकीसाठी शेकडो सभा घेवून विदर्भवारी करणारे पंतप्रधान आज विदर्भात आणि देशात दुष्काळ असताना एकदाही फिरकलेले नाहीत. यावरून त्यांचा जनतेप्रति असलेला कळवळा दिसतो, अशीही टीका त्यांनी केली. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश आणि आश्वासनातील खोटारडेपणा जनतेसमोर आणण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, राज्यसभा सदस्य राज बब्बर, राष्ट्रीय युवक कांग्रेस अध्यक्ष अमरींद्र सिग राजा ब्रार व प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी खासदार नरेश पुगलिया, पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बढे, यवतमाळ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस भरत राठोड, राहुल पुगलिया, गजानन गावंडे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)