शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची शेतकरी संघटनेला साथ

By admin | Updated: June 4, 2015 01:15 IST

पक्षाने मोठे पद दिले असले तरी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेपायी सतत पक्षविरोधात वागणाऱ्या आबीद अली यांनी वनसडी येथील आदिवासी...

चंद्रपूर : पक्षाने मोठे पद दिले असले तरी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेपायी सतत पक्षविरोधात वागणाऱ्या आबीद अली यांनी वनसडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील निवडणुकीत उचललेले पाऊल राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेचे ठरले आहे.वनसडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (र.न.९०३) येथील संचालक मंडळाची निवडणूक ७ जूनला होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या क्षेत्रात शेतकरी संघटना माघारली. संघटनेचे स्थानिक कार्यकर्तेही पुन्हा लढण्याच्या मानसिकतेत नसताना आबीद अली यांनी पुढाकार घेवून शेतकरी संघटनेचे सहा उमेदवार रिंंगणात उभे केले. त्यांच्यासोबत काँग्रेसधील सात कार्यकर्तेही मैदानात उतरविले. असा स्वत:सह १३ उमेदवारांचा गट उभा केला. पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांना विचारात न घेता शेतकरी संघटनेच्या आधाराने उभे केलेल्या पॅनलची बैठक घेवून त्यांनी स्वत:सह सर्वांचे नामनिर्देशनही दाखल केले.स्वत: काँग्रेस पक्षाचे कोरपना तालुकाध्यक्ष आणि काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष असलेल्या आबीद अली यांनी पक्षातील कुण्याही जबाबदार पदाधिकाऱ्यांना अथवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हे पाऊल उचलले. त्यांची ही कृती न रूचल्याने जिल्हौ मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रईधरराव गोडे यांच्यापुढाकारात काँगे्रस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्षांच्याच विरोधात पॅनल उभारण्याची तयारी दर्शविली. या बैठकीत आबीद अली यांनी संघटनेला पाच जागा, काँग्रेसला पाच आणि स्वत:च्या उमेदवारांना तीन जागा दिल्यास तडजोड करू आणि अविरोध निवडणूक करू असा प्रस्ताव दिला. मात्र तो कार्यकर्त्यांनी धुडकावून लावल्याने अखेर काँग्रेस तालुकाध्यक्ष असलेल्या आबीद अली यांच्या विरोधातच दुसरे पॅनल उभे झाले आहे.दरम्यान, आपल्या विरोधात पक्षातील सर्वजण एकवटल्याने आबीद अली यांनी अखेरच्या क्षणी स्वत:चे नामांकन परत घेतले. मात्र काँग्रेसच्या गटाला त्याची साथ मिळण्याची प्रतीक्षा कायमच आहे. काँगे्रसच्या गटातील तीन सदस्य अविरोध आले असून १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आबीद अली कोणत्या गटासोबत राहतात, याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)