शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:12 IST

केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे.

ठळक मुद्देचिमूर येथे घंटानाद आंदोलनाने केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे. काँग्रेसने सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र भाजपच्या राज्य सरकारने भेदभाव करणारी कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश वारजुकर यांनी महागाई विरोधात आयोजित घंटानाद आंदोलनात केले.घंटानाद आंदोलनाची सुरुवात काँग्रेस कार्यालयापासून झाली व उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन डॉ. अविनाश वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.घंटानाद आंदोलनात डॉ. सतिश वारजुकर यांनी भाववाढीशिवाय या भाजपा सरकारने कोणतेही काम केले नसल्याचा आरोप करीत सामान्य जनतेची लूट चालली असल्याचे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता विजय गावंडे, प्रा.श्याम राऊत, संजय डोंगरे, विजय डाबरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर यावेळी कडाडून टिका केली.काँग्रेस कार्यालयापासून सुरु झालेले घंटानाद आंदोलनाची सांगता उपविभागीय अधिकारी कार्यालयात झाली. यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती उपसभापती शांताराम सेलवटकर, काँग्रेस गट नेता रोशन ढोक, पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, नगरसेवक कदीर शेख, विनोद ढाकूनकर, कल्पना इंदूरकर, काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा सविता चौधरी, योगिता थुटे, शंकरपूरच्या सरपंच दिक्षा भगत, उपसरपंच लिलाधर बन्सोड, अरविंद रेवतकर, अविनाश अगडे व काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.