शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:12 IST

केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे.

ठळक मुद्देचिमूर येथे घंटानाद आंदोलनाने केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे. काँग्रेसने सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र भाजपच्या राज्य सरकारने भेदभाव करणारी कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश वारजुकर यांनी महागाई विरोधात आयोजित घंटानाद आंदोलनात केले.घंटानाद आंदोलनाची सुरुवात काँग्रेस कार्यालयापासून झाली व उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन डॉ. अविनाश वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.घंटानाद आंदोलनात डॉ. सतिश वारजुकर यांनी भाववाढीशिवाय या भाजपा सरकारने कोणतेही काम केले नसल्याचा आरोप करीत सामान्य जनतेची लूट चालली असल्याचे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता विजय गावंडे, प्रा.श्याम राऊत, संजय डोंगरे, विजय डाबरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर यावेळी कडाडून टिका केली.काँग्रेस कार्यालयापासून सुरु झालेले घंटानाद आंदोलनाची सांगता उपविभागीय अधिकारी कार्यालयात झाली. यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती उपसभापती शांताराम सेलवटकर, काँग्रेस गट नेता रोशन ढोक, पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, नगरसेवक कदीर शेख, विनोद ढाकूनकर, कल्पना इंदूरकर, काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा सविता चौधरी, योगिता थुटे, शंकरपूरच्या सरपंच दिक्षा भगत, उपसरपंच लिलाधर बन्सोड, अरविंद रेवतकर, अविनाश अगडे व काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.