शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:40 IST

देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत ...

मोर्चा, धरणे आणि घेराव : केंद्राच्या निर्णयाचा भाजीपाला वाटून निषेधचंद्रपूर : देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी जिल्ह्यात जनआक्रोश मांडला. हा आक्रोश प्रगट करण्यासाठी जनआक्रोश रॅली काढली, रस्त्यावर मोफत भाजीपाला वाटला आणि गांधी चौकात दिवसभर धरणा दिला. विशेष म्हणजे, मुद्दा एकच असला तरी हा जनआक्रोश काँग्रेसच्या नेत्यांनी तीन ठिकाणी मांडल्याने आवाज मात्र विखुरला.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात दिवसभर काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी धरणा दिला. यात युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल पदाधिकारी, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, एनएसयुआय, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर धरणा दिल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले. सायंकाळी ५ वाजता धरणा समाप्त झाला.दुसरे आयोजन जिल्हा काँग्रेस कमेटीने स्थानिक संजय गांधी मार्केेटपासून केले होते. कार्यक्रमस्थळी मंडप घालून छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे निरीक्षक राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश रॅली काढण्यात आली. यात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते हातात पंतप्रधान मोदी आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहचल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. नोटाबंदीचा निर्णय जनतेसाठी आणि देशासाठी मारक असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली.तिसरे आयोजन चंद्र्रपूर महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले होते. नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकातून दुपारी दीड वाजता जनआक्रोश रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. गाड्यांध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी मार्गातील नागरिकांना मोफत वाटून मोदी सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. अनेकांनी या उपक्रमाला दाद दिली. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर तिथे छोटेखानी सभा झाली. त्यातही नोटाबंदीच्या विषयावरून मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढविण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)मोदींचा एककल्ली निर्णय देशासाठी घातक -पुगलियागांधी चौकातील धरणा कार्यक्रमादरम्यान माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय कोणत्याही अर्थतज्ज्ञाचा सल्ला न घेता केलेला असून मोदी यांच्या या एककल्ली निर्णयामुळे देश आर्थिक संकटाकडे चालला आहे. देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घातक असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ऐन हंगामाच्या काळात मोदींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उत्पादित मालाला मातीमोल भाव आला. शेती चालविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने अनेकांना भविष्यात संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी मोदींनी हे पाऊल उचलेले असले तरी काय साध्य झाले, याचे उत्तर त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना द्यावे, असेही ते म्हणाले. भविष्यात असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळयापुढे ठेवून या सरकारने भूमीपूजन करण्याचा आणि घोषणा करण्याचा सपाटा चालविल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.