शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:40 IST

देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत ...

मोर्चा, धरणे आणि घेराव : केंद्राच्या निर्णयाचा भाजीपाला वाटून निषेधचंद्रपूर : देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी जिल्ह्यात जनआक्रोश मांडला. हा आक्रोश प्रगट करण्यासाठी जनआक्रोश रॅली काढली, रस्त्यावर मोफत भाजीपाला वाटला आणि गांधी चौकात दिवसभर धरणा दिला. विशेष म्हणजे, मुद्दा एकच असला तरी हा जनआक्रोश काँग्रेसच्या नेत्यांनी तीन ठिकाणी मांडल्याने आवाज मात्र विखुरला.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात दिवसभर काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी धरणा दिला. यात युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल पदाधिकारी, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, एनएसयुआय, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर धरणा दिल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले. सायंकाळी ५ वाजता धरणा समाप्त झाला.दुसरे आयोजन जिल्हा काँग्रेस कमेटीने स्थानिक संजय गांधी मार्केेटपासून केले होते. कार्यक्रमस्थळी मंडप घालून छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे निरीक्षक राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश रॅली काढण्यात आली. यात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते हातात पंतप्रधान मोदी आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहचल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. नोटाबंदीचा निर्णय जनतेसाठी आणि देशासाठी मारक असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली.तिसरे आयोजन चंद्र्रपूर महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले होते. नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकातून दुपारी दीड वाजता जनआक्रोश रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. गाड्यांध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी मार्गातील नागरिकांना मोफत वाटून मोदी सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. अनेकांनी या उपक्रमाला दाद दिली. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर तिथे छोटेखानी सभा झाली. त्यातही नोटाबंदीच्या विषयावरून मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढविण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)मोदींचा एककल्ली निर्णय देशासाठी घातक -पुगलियागांधी चौकातील धरणा कार्यक्रमादरम्यान माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय कोणत्याही अर्थतज्ज्ञाचा सल्ला न घेता केलेला असून मोदी यांच्या या एककल्ली निर्णयामुळे देश आर्थिक संकटाकडे चालला आहे. देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घातक असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ऐन हंगामाच्या काळात मोदींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उत्पादित मालाला मातीमोल भाव आला. शेती चालविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने अनेकांना भविष्यात संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी मोदींनी हे पाऊल उचलेले असले तरी काय साध्य झाले, याचे उत्तर त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना द्यावे, असेही ते म्हणाले. भविष्यात असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळयापुढे ठेवून या सरकारने भूमीपूजन करण्याचा आणि घोषणा करण्याचा सपाटा चालविल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.