शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:40 IST

देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत ...

मोर्चा, धरणे आणि घेराव : केंद्राच्या निर्णयाचा भाजीपाला वाटून निषेधचंद्रपूर : देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी जिल्ह्यात जनआक्रोश मांडला. हा आक्रोश प्रगट करण्यासाठी जनआक्रोश रॅली काढली, रस्त्यावर मोफत भाजीपाला वाटला आणि गांधी चौकात दिवसभर धरणा दिला. विशेष म्हणजे, मुद्दा एकच असला तरी हा जनआक्रोश काँग्रेसच्या नेत्यांनी तीन ठिकाणी मांडल्याने आवाज मात्र विखुरला.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात दिवसभर काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी धरणा दिला. यात युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल पदाधिकारी, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, एनएसयुआय, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर धरणा दिल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले. सायंकाळी ५ वाजता धरणा समाप्त झाला.दुसरे आयोजन जिल्हा काँग्रेस कमेटीने स्थानिक संजय गांधी मार्केेटपासून केले होते. कार्यक्रमस्थळी मंडप घालून छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे निरीक्षक राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश रॅली काढण्यात आली. यात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते हातात पंतप्रधान मोदी आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहचल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. नोटाबंदीचा निर्णय जनतेसाठी आणि देशासाठी मारक असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली.तिसरे आयोजन चंद्र्रपूर महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले होते. नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकातून दुपारी दीड वाजता जनआक्रोश रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. गाड्यांध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी मार्गातील नागरिकांना मोफत वाटून मोदी सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. अनेकांनी या उपक्रमाला दाद दिली. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर तिथे छोटेखानी सभा झाली. त्यातही नोटाबंदीच्या विषयावरून मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढविण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)मोदींचा एककल्ली निर्णय देशासाठी घातक -पुगलियागांधी चौकातील धरणा कार्यक्रमादरम्यान माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय कोणत्याही अर्थतज्ज्ञाचा सल्ला न घेता केलेला असून मोदी यांच्या या एककल्ली निर्णयामुळे देश आर्थिक संकटाकडे चालला आहे. देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घातक असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ऐन हंगामाच्या काळात मोदींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उत्पादित मालाला मातीमोल भाव आला. शेती चालविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने अनेकांना भविष्यात संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी मोदींनी हे पाऊल उचलेले असले तरी काय साध्य झाले, याचे उत्तर त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना द्यावे, असेही ते म्हणाले. भविष्यात असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळयापुढे ठेवून या सरकारने भूमीपूजन करण्याचा आणि घोषणा करण्याचा सपाटा चालविल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.