शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

ग्रामीण राजकारणात काँग्रेसची सरशी

By admin | Updated: August 6, 2015 23:57 IST

जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून जाहीर करण्यात आला.

प्रस्थापितांना फटका : राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावेचंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून जाहीर करण्यात आला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर समिकरण बांधणाऱ्यांना या निकालात चांगलाच धक्का बसला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारणात काँग्रेसने मुसंडी मारल्याचे निकालावरून दिसून येत आहे. भाजपाप्रणित पॅनलला भद्रावती, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यातच आपले वर्चस्व स्थापित करता आले. तर वरोरा तालुक्यात पहिल्यांदाच शिवसेनेने सरशी घेतली आहे. भद्रावती तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व दिसून आले. त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार जवळपास बरोबरीने निवडून आले. मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतीपैकी भाजपाने २३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसला ८ वरच समाधान मानावे लागले. बहुजन समाज पार्टीने प्रथमच केळझर व जानाळा या २ ग्रामपंचायतीवर सत्ता बसविली. चिमूर तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाने बाजी मारली तर सत्ताधारी पक्षाच्या गटाला जोरदार हादरा बसला आहे. राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीपैकी भाजपा आणि काँग्रेसने १४ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. शेतकरी संघटनेने १३ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजप कब्जा केला असून काही ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. वरोरा तालुक्यात शिवसेनेने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत घेतले आहे. कोरपना तालुक्यात १७ पैकी काँग्रेसने ८ ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले. पोंभूर्णा तालुक्यात २६ पैकी काँग्रेस पक्षाकडे १४ तर भाजपाकडे ११ ग्रामपंचायत आहे. बल्लारपूर तालुक्यातील ९२ जागेपैकी ६५ जागा काँग्रेसप्रणित आघाडीच्या उमेदवारांनी काबीज केल्या. नागभीड तालुक्यात २९ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. (लोकमत चमू)