शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

ग्रामीण राजकारणात काँग्रेसची सरशी

By admin | Updated: August 6, 2015 23:57 IST

जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून जाहीर करण्यात आला.

प्रस्थापितांना फटका : राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावेचंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून जाहीर करण्यात आला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर समिकरण बांधणाऱ्यांना या निकालात चांगलाच धक्का बसला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारणात काँग्रेसने मुसंडी मारल्याचे निकालावरून दिसून येत आहे. भाजपाप्रणित पॅनलला भद्रावती, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यातच आपले वर्चस्व स्थापित करता आले. तर वरोरा तालुक्यात पहिल्यांदाच शिवसेनेने सरशी घेतली आहे. भद्रावती तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व दिसून आले. त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार जवळपास बरोबरीने निवडून आले. मूल तालुक्यात ३७ ग्रामपंचायतीपैकी भाजपाने २३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसला ८ वरच समाधान मानावे लागले. बहुजन समाज पार्टीने प्रथमच केळझर व जानाळा या २ ग्रामपंचायतीवर सत्ता बसविली. चिमूर तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाने बाजी मारली तर सत्ताधारी पक्षाच्या गटाला जोरदार हादरा बसला आहे. राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीपैकी भाजपा आणि काँग्रेसने १४ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. शेतकरी संघटनेने १३ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजप कब्जा केला असून काही ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. वरोरा तालुक्यात शिवसेनेने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत घेतले आहे. कोरपना तालुक्यात १७ पैकी काँग्रेसने ८ ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले. पोंभूर्णा तालुक्यात २६ पैकी काँग्रेस पक्षाकडे १४ तर भाजपाकडे ११ ग्रामपंचायत आहे. बल्लारपूर तालुक्यातील ९२ जागेपैकी ६५ जागा काँग्रेसप्रणित आघाडीच्या उमेदवारांनी काबीज केल्या. नागभीड तालुक्यात २९ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वरचष्मा आहे. (लोकमत चमू)