शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कांँग्रेस पुढार्‍यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करावे

By admin | Updated: May 20, 2014 23:33 IST

सिंदेवाही तालुक्यात आपल्या राजकीय पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्यकर्त्याच्या समस्या सुटाव्यात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे याकरिता कोणत्याही राजकीय पक्षात प्रयत्न होताना दिसत नाही.

बाबूराव परसावार - सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यात आपल्या राजकीय पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्यकर्त्याच्या समस्या सुटाव्यात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे याकरिता कोणत्याही राजकीय पक्षात प्रयत्न होताना दिसत नाही. उलट एखादा पक्ष मोठा झाला की, त्याला बंडखोरीची लागण लागते. पक्ष वाढला, पक्षातील नेते वाढले की गटबाजीला ऊत येतो. पक्षांतर्गत शहकाटशाहाचे राजकारण खेळल्या जाते आणि मग निवडणुकीत तिकीट मिळाले नाही की, तो बंडखोर होतो. बंडाचा झेंडा हातात घेवून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध रिंगणात उडी घेतो. सिंदेवाही तालुक्यातही हिच स्थिती आहे. चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा निकाल जाहीर झाला. या क्षेत्रातून भाजपाचे अशोक नेते २ लाख ३६ हजार मतांनी विजय झाले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तीन तालुक्याचा समावेश आहे. ब्रह्मपुरी विधानसा क्षेत्रातून अशोक नेते यांना ८६ हजार ३५० तर, काँग्रेसचे डॉ. नामेदव उसेंडी यांना ५६ हजार १८३ मते मिळाली. भाजपाचे अशोक नेते यांना ३० हजार १६७ मताची आघाडी मिळाली. सिंदेवाही तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता मात्र राहिलेला नाही. मागील विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांपेक्षा पक्षांतर्गत घरभेद्यांचा काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. काँग्रेसच्या गटबाजीचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला व भाजपाचे अतुल देशकर हे २००९ च्या विधानसभेत निवडून आले. काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार निवडून आल्यानंतर गटबाजीचे राजकारण सुरू करतात व सर्व सामान्य नागरिकांना विसरून जातात. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सिंचन प्रकल्प, टोल टॅक्स, विकासाची कामे या कारणाने नागरिक त्रस्त झाले होते. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणूक निकालावरुन दिसून आले. मोदी लाटेमुळे अशोक नेते यांचे मताधिक्य वाढले तर, काँग्रेसचा सफाया झाला. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या नियोजनाचा अभाव होता. मित्र पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली. प्रचार कार्यालयात चार-पाच कार्यकर्ते सोडले तर, काँग्रेसचे पदाधिकारी फिरकले नाहीत. राष्ट्रवादी पक्षाला सन्मानाने वागणूक दिली नसल्याचे आता कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे. तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी थोडे अंर्तमुख होवून आत्म परिक्षण करणे महत्त्वाचे आहे.