शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कांँग्रेस पुढार्‍यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करावे

By admin | Updated: May 20, 2014 23:33 IST

सिंदेवाही तालुक्यात आपल्या राजकीय पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्यकर्त्याच्या समस्या सुटाव्यात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे याकरिता कोणत्याही राजकीय पक्षात प्रयत्न होताना दिसत नाही.

बाबूराव परसावार - सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यात आपल्या राजकीय पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्यकर्त्याच्या समस्या सुटाव्यात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे याकरिता कोणत्याही राजकीय पक्षात प्रयत्न होताना दिसत नाही. उलट एखादा पक्ष मोठा झाला की, त्याला बंडखोरीची लागण लागते. पक्ष वाढला, पक्षातील नेते वाढले की गटबाजीला ऊत येतो. पक्षांतर्गत शहकाटशाहाचे राजकारण खेळल्या जाते आणि मग निवडणुकीत तिकीट मिळाले नाही की, तो बंडखोर होतो. बंडाचा झेंडा हातात घेवून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध रिंगणात उडी घेतो. सिंदेवाही तालुक्यातही हिच स्थिती आहे. चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा निकाल जाहीर झाला. या क्षेत्रातून भाजपाचे अशोक नेते २ लाख ३६ हजार मतांनी विजय झाले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तीन तालुक्याचा समावेश आहे. ब्रह्मपुरी विधानसा क्षेत्रातून अशोक नेते यांना ८६ हजार ३५० तर, काँग्रेसचे डॉ. नामेदव उसेंडी यांना ५६ हजार १८३ मते मिळाली. भाजपाचे अशोक नेते यांना ३० हजार १६७ मताची आघाडी मिळाली. सिंदेवाही तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता मात्र राहिलेला नाही. मागील विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांपेक्षा पक्षांतर्गत घरभेद्यांचा काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. काँग्रेसच्या गटबाजीचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला व भाजपाचे अतुल देशकर हे २००९ च्या विधानसभेत निवडून आले. काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार निवडून आल्यानंतर गटबाजीचे राजकारण सुरू करतात व सर्व सामान्य नागरिकांना विसरून जातात. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सिंचन प्रकल्प, टोल टॅक्स, विकासाची कामे या कारणाने नागरिक त्रस्त झाले होते. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणूक निकालावरुन दिसून आले. मोदी लाटेमुळे अशोक नेते यांचे मताधिक्य वाढले तर, काँग्रेसचा सफाया झाला. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या नियोजनाचा अभाव होता. मित्र पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली. प्रचार कार्यालयात चार-पाच कार्यकर्ते सोडले तर, काँग्रेसचे पदाधिकारी फिरकले नाहीत. राष्ट्रवादी पक्षाला सन्मानाने वागणूक दिली नसल्याचे आता कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे. तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी थोडे अंर्तमुख होवून आत्म परिक्षण करणे महत्त्वाचे आहे.