शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

काँग्रेसची ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ मोहीम

By admin | Updated: July 14, 2017 00:22 IST

हे फसणवीस सरकार आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून ‘माझी कर्जंमाफी झाली नाही

विजय वडेट्टीवार : पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचे संकेत लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हे फसणवीस सरकार आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून ‘माझी कर्जंमाफी झाली नाही’ असे फार्म शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम आखली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या या मोहीमेची सुरूवात ब्रह्मपुरी तालुक्यातून करण्यात आली असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कर्जमाफीवरून विरोधक येत्या पावसाळी अधिवेशात सरकारला घेरले जाणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच आ. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.कर्जमाफीबाबत राज्य सरकार केवळ ‘जीआरवर जीआर’ काढत आहे. ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ज्या अटी लादल्या त्यामुळे केवळ ३० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी येत्या २० जुलैपर्यंत तालुकानिहाय दिंडी काढून शेतकऱ्यांकडून ‘‘फार्म’ भरुन घेतले जाणार आहे. यावर गावांमध्ये चावडी वाचनही केले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून गोळा झालेले ‘माझी कर्जंमाफी झाली नाही’ हे फार्म प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांकडे देणार आहे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले. शासन दररोज नवनवीन जीआर काढून कर्जमाफीबाबत अटी लादत आहे. यामुळे राज्यातील एक कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ३० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. उर्वरित शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ९६ हजार शेतकरी वंचित राहणार असल्याचेही आ. वडेट्टीवार म्हणाले. कर्जमाफी जून २०१६ पर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. ती जून २०१७ पर्यंत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी असती तर ८२ टक्के शेतकरी फायदा घेऊ शकले असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतीपूरक उद्योगासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. त्यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही आ. वडेट्टीवार यांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदु नागरकर, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख महेश मेंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्वीनी खोब्रागडे, जि.प.चे काँग्रेसचे गटनेते सतीश वारजुरकर, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, विनायक बांगडे, युवक काँग्रेसचे शिवा राव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.