शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

काँग्रेसने देशाला मुर्ख बनविण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:23 IST

काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : नागभीड येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे केले.ते नागभीड येथे आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, गडचिरोली - चिमूर लोकसभेचे उमेदवार अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेशकुमार भांगडिया, जि.प.उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते, नागभीडचे नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृ.उ.बा.स.सभापती आवेश पठाण, वसंत वारजूकर, न.प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, चिमूर - नागभीडचे भाजप - शिवसेना तालुका अध्यक्ष यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सरकारने गरिबांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या. विविध योजनांचे गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जाऊ लागले आहेत. ९८ टक्के कुटुंबाकडे आता शौचालये झाली आहेत. पाच कोटी कुटुंबांना गॅस दिले आहेत. मुद्रा लोनद्वारे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.गरिबांना घरे देण्याचे काम मोदी सरकारने केले. दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन या देशात महामार्गांचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी सरकारच्या काळात झाले, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार अशोक नेते, आ.कीर्तीकुमार भांगडिया यांनीही मनोगत व्यक्त केले.