शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जिवती तहसील कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: October 26, 2016 00:56 IST

सरकारने जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील शेतकऱ्यांच्या जमिनी वनजमीन म्हणून घोषित केल्याच्या ...

जिवती : सरकारने जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील शेतकऱ्यांच्या जमिनी वनजमीन म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमेटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात हजारो कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा जिवती तहसील कार्यालयावर धडकला.यावेळी तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गोदरु पाटील जुमनाके, राजुरा विधानसभा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, माजी जि.प. सदस्य भीमराव पाटील मडावी, पंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे, नगराध्यक्ष गजानन जुमनाके, माजी पंचायत समिती सभापती दत्तात्रेय माने, विधानसभा युवक कॉंग्रेसचे महासचिव अश्पाक शेख, निशीकांत सोनकांबळे, ममता जाधव, गणपत आडे, भीमराव मेश्राम आदी नेते उपस्थित होते. जिवती तालुक्यातील संपूर्ण माणिकगड पहाड सरकारने वनजमीन घोषित करून अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे अख्या जिवती तालुक्यातील लोकांच्या उदरनिर्वाह व निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने सदर कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.तसेच अतिक्रमीत आणि शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना त्वरित शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, प्रचलित महाराष्ट्र व तेलंगाना सीमेवर असलेल्या १४ गावातील जमिनीचे अभिलेख तयार करून शेतकऱ्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे, जिवती येथील मंजूर ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम त्वरित सुरु करण्यात यावे, जिवती, कोदेपूर व गुडशेला येथील बंद केलेले तलावाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, तलावात गेलेल्या शेतजमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, ज्या आदिवासींना शेतजमिनीचे पट्टे मिळाले आहे, अशा शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावा, जातीच्या दाखल्याबाबतच्या जाचक अटी दूर करण्यात याव्या, युपीए सरकारच्या काळात तेंदूपत्ता मजुरांना बोनस मिळत होते, ते पूर्ववत सुरु करण्यात यावे, तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, त्वरित रस्ते दुरुस्त करण्यात यावे, २००५-०६ च्या वनहक्क कायद्यानुसार वनहक्क पट्टे इतर पारंपारिक वनशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)राज्य शासन असंवेदनशील -सुभाष धोटेमाणिकगड पहाडावरील वनजमिन घोषित करून वास्तव्य व कास्त करीत असलेल्या हजारो लोकांना न्यायालयाच्या आदेशामुळे बेघर व भुमीहीन होण्याची वेळ आली आहे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असते. मात्र जिल्ह्यात आमदार, खासदार, वनमंत्री व केंद्रीय मंत्री असताना शासन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात न गेल्याचे आश्चर्य वाटते. राज्य शासन असंवेदनशील असल्याचा आरोप माजी आमदार तथा प्रदेश कॉँग्रेस कमेटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांनी यावेळी केला आहे.