शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

कर्जमाफी तरीही काँग्रेसची टीका हास्यास्पद : अहीर

By admin | Updated: June 27, 2017 00:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ३४.०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी करून राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ३४.०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी करून राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारची शेतकऱ्यांप्रतीची संवेदनशीलता या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाशी निगडीत असल्याने विरोधकांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे सोडून काँग्रेसकडून सरकारवर टिका केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून होणारी टिका हा प्रकारच हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे.ना. अहीर पुढे म्हणाले, सन २००९ मध्ये केंद्रातील तत्कालीन संपुआ सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा झाला नव्हता. मात्र विद्यमान राज्य सरकारने स्वत:च्या दिमतीवर ३४ हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज माफ करून राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. एवढेच नव्हे तर देशात सर्वाधिक म्हणजे दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून व ज्यांनी कर्जाची परतफेड मुदतीत केली, त्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यातून शेतकऱ्यांप्रती असलेल्या पारदर्शी भूमिकेचा प्रत्यय येतो. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून या कर्जमाफीचा उल्लेख होत असल्याचे ना. अहीर यांनी म्हटले आहे.