शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी तरीही काँग्रेसची टीका हास्यास्पद : अहीर

By admin | Updated: June 27, 2017 00:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ३४.०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी करून राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ३४.०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी करून राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारची शेतकऱ्यांप्रतीची संवेदनशीलता या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाशी निगडीत असल्याने विरोधकांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे सोडून काँग्रेसकडून सरकारवर टिका केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून होणारी टिका हा प्रकारच हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे.ना. अहीर पुढे म्हणाले, सन २००९ मध्ये केंद्रातील तत्कालीन संपुआ सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा झाला नव्हता. मात्र विद्यमान राज्य सरकारने स्वत:च्या दिमतीवर ३४ हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज माफ करून राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. एवढेच नव्हे तर देशात सर्वाधिक म्हणजे दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून व ज्यांनी कर्जाची परतफेड मुदतीत केली, त्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यातून शेतकऱ्यांप्रती असलेल्या पारदर्शी भूमिकेचा प्रत्यय येतो. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून या कर्जमाफीचा उल्लेख होत असल्याचे ना. अहीर यांनी म्हटले आहे.