शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सोमवारी काँग्रेसची भारत बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:29 IST

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण, महागाई, खासगीकरण व बेरोजगारी विरोधात कॉंग्रेस पक्षाने २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची ...

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण, महागाई, खासगीकरण व बेरोजगारी विरोधात कॉंग्रेस पक्षाने २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. पक्षाने सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. रविवारी चंद्रपूर येथे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व महानगर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी पत्रकार परिषदेत भारत बंद आंदोलनाची माहिती दिली.

सत्तेवर येण्यासाठी भाजपने देशातील जनतेला भरमसाट खोटी आश्वासने दिली. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून सत्तेत आणले. मात्र मागील सात वर्षापासून भाजपने देशात हुकूमशाही राजवट सुरू केली असून मोदी सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. हे कायदे मागे घ्यावेत म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, तरी या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही, असे त्यांनी सांगितले.

तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्याही नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. देशातला तरुण बेरोजगार करून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदीच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने सुरू आहे. या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठविला असून सोमवारी भारत बंदचे आवाहन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, सुनीता अग्रवाल, राजेश अडुर, प्रमोद बोरीकर, किशोर दुपारे उपस्थित होते.

260921\img-20210926-wa0031.jpg

आंदोलनाची माहिती देताना प्रकाश देवतळे, रामू तिवारी व काँग्रेस पदाधिकारी