शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

काँग्रेस व भाजपचा आपणच जिल्ह्यात वरचढ असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST

बाॅक्स जिल्ह्यातील ७५ टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा - काँग्रेस चंद्रपूर जिल्ह्यातील ६३९ पैकी ७५ टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेस व ...

बाॅक्स

जिल्ह्यातील ७५ टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा - काँग्रेस

चंद्रपूर जिल्ह्यातील ६३९ पैकी ७५ टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेस व महाविकास आघाडीने दावा केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढली. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काँग्रेससह महाविकास आघाडीने ७५ टक्के यश संपादन केल्याचा दावा केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सोमवारी निकाल लागलेल्या ६८ पैकी ४८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर काही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यश संपादन केल्याचा दावा केला आहे. सिंदेवाही तालुक्यात ३८, सावली तालुक्यात ३५, भद्रावती तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसह वरोरा विधानसभा मतदारसंघात ९० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातील ७९ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी दावा केला आहे. त्यांनीही तालुकानिहाय ग्रामपंचायतींची नावे जाहीर केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी मूल तालुक्यात २२ ग्रामपंचायतींवर काँग्रेस व महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे सांगून गावनिहाय विजयी उमेदवारांची नावेही दिली आहे. चिमूर तालुक्यात काँग्रेसचा ८१ च्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविल्याचा दावा जि.प. गटनेता डाॅ. सतीश वारजुकर यांनी केला आहे.

बाॅक्स

२५ टक्के ग्रामपंचायती आमच्या ताब्यात - राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली गेली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने २५ टक्के ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावाही राजेंद्र वैद्य यांनी केला आहे. हे वर्चस्व जिल्ह्यात चौफेर असल्याचेही वैद्य यांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

३३९ ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्‍व -भाजप

भाजपने जिल्ह्यातील ६३९ पैकी ३३९ ग्रामपंचायतींवर आपला दावा सांगितले आहे. भाजपने शेतकरी ग्रामीण विकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय यादीच प्रसिद्धीला दिली आहे. राज्‍याचे माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍ह्यात केलेल्‍या अभूतपूर्व विकासकामांचे हे यश असल्याचेही म्हटले आहे. चंद्रपूर तालुक्‍यात २२, मुल तालुक्‍यात २४, पोंभुर्णा तालुक्‍यात १७, बल्‍लारपूर तालुक्‍यात ८, सावली तालुक्‍यात २५, नागभीड तालुक्‍यात २४, चिमूर तालुक्‍यात ६०, सिंदेवाही तालुक्‍यात २४, राजुरा तालुक्‍यात १४, कोरपना तालुक्‍यात ७, वरोरा तालुक्‍यात २८, ब्रम्‍हपुरी तालुक्‍यात ३३, भद्रावती तालुक्‍यात ३०, गोंडपिपरी तालुक्‍यात २३ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. चिमूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केला आहे.