शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

विमानतळाबाबत चंदनखेडावासीयांमध्ये संभ्रम

By admin | Updated: January 10, 2015 01:07 IST

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे व्यावसायिक विमानतळ तयार करण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरी असून त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

चंदनखेडा: भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे व्यावसायिक विमानतळ तयार करण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरी असून त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात राज्यपालांचा दौरा पार पडला. त्यानंतर नागपूर येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी भद्रावतीजवळील व्यावसायिक विमानतळाबाबत माहिती दिली. मात्र तो प्रस्ताव सदोष असून पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची पाळी येणार असल्याचे चित्र आहे. यामुळे विमानतळाचा प्रश्न अधांतरी आहे. शासनाच्या दृष्टीने योग्य असलेल्या चंदनखेडा येथील जागेवर विमानतळ तयार करण्यात यावे व संसद आदर्श ग्रामयोजनेत निवड झालेल्या या गावाच्या विकासाची गती वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळाला व्यावसायिक स्वरूप देण्याची योजना आहे. मोरवा येथील विमानतळाचे तांत्रिकदृष्ट्या विस्तारीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे इतरत्र जागेची पाहणी करुन भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा बेलगाव परिसरातील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र ढोरवासाजवळील निप्पॉन डेन्रो कंपनीची जागा राज्यमार्गाला लागून असल्याने या जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कळते. परंतु भारत सरकारचा उपक्रम असलेली आंध्रप्रदेश ते राजस्थान व्हाया भद्रावती मार्गावर नैसर्गिक वायुची १ हजार ७०४ किलोमीटर लांबीची पावणेतीन फूट व्यासाची पाईपलाईन याच परिसरातून जाणार आहे. त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. तसेच या परिसरालगत कोळसा खाणी, एनटीपीसीचे टॉवर व अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे मोठे टॉवर आहेत. तसेच आयुधनिर्माणीसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन वर्धा नदीवरुन तेलवासा ढोरवासा व निप्पॉन डेन्रोच्या जागेवरुन गेलेली आहे. असे असतानासुद्धा या कंपनीच्या जागेचा प्रस्ताव कसा काय गेला? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे.याशिवाय या जागेबाबत संबंधित शेतकऱ्यांनी नागपूर न्यायालयातही प्रकरण न्यायप्रविष्ट केल्याची माहिती आहे. त्यामुळे या तांत्रिकबाबी तसेच इतर अडचणींमुळे निप्पॉन डेन्रो कंपनीच्या जागेचा प्रस्ताव सदोष ठरणारा असून त्यामुळे पुन्हा विमानतळ निर्मितीचा घोळ कायम राहण्याची शक्यता आहे. विमानतळासाठी राज्यमार्गाचे कमी अंतर असले पाहिजे, असाच निकष असेल तर चंदनखेडा जवळून नुकताच वरोरा- पावना- सागरा- चंदनखेडा- मुधोली- मोहर्ली ते ताडोबा- चिमूर असा राज्यमार्ग मंजूर होवून कामाच्या निविदाही निघाल्या आहेत. चंदनखेडातील नियोजित विमानतळ क्षेत्र हे या राज्यमार्गाला लागूनच आहे. तसेच येथील शेतजमीनीवर कुठलेही टॉवर किंवा जंगलही नाही. पूर्णत: प्रदूषणविरहीत असा हा परिसर आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेत चंद्रपूर-वणी- आर्णी या लोकसभा क्षेत्रातून चंदनखेडा या ग्रामपंचायतीची खासदार हंसराज अहीर यांनी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे या गावाकडे विशेष राहणार आहे. त्यांनीही विमानतळासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)