शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

विमानतळाबाबत चंदनखेडावासीयांमध्ये संभ्रम

By admin | Updated: January 10, 2015 01:07 IST

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे व्यावसायिक विमानतळ तयार करण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरी असून त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

चंदनखेडा: भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे व्यावसायिक विमानतळ तयार करण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरी असून त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात राज्यपालांचा दौरा पार पडला. त्यानंतर नागपूर येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी भद्रावतीजवळील व्यावसायिक विमानतळाबाबत माहिती दिली. मात्र तो प्रस्ताव सदोष असून पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची पाळी येणार असल्याचे चित्र आहे. यामुळे विमानतळाचा प्रश्न अधांतरी आहे. शासनाच्या दृष्टीने योग्य असलेल्या चंदनखेडा येथील जागेवर विमानतळ तयार करण्यात यावे व संसद आदर्श ग्रामयोजनेत निवड झालेल्या या गावाच्या विकासाची गती वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळाला व्यावसायिक स्वरूप देण्याची योजना आहे. मोरवा येथील विमानतळाचे तांत्रिकदृष्ट्या विस्तारीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे इतरत्र जागेची पाहणी करुन भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा बेलगाव परिसरातील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र ढोरवासाजवळील निप्पॉन डेन्रो कंपनीची जागा राज्यमार्गाला लागून असल्याने या जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कळते. परंतु भारत सरकारचा उपक्रम असलेली आंध्रप्रदेश ते राजस्थान व्हाया भद्रावती मार्गावर नैसर्गिक वायुची १ हजार ७०४ किलोमीटर लांबीची पावणेतीन फूट व्यासाची पाईपलाईन याच परिसरातून जाणार आहे. त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. तसेच या परिसरालगत कोळसा खाणी, एनटीपीसीचे टॉवर व अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे मोठे टॉवर आहेत. तसेच आयुधनिर्माणीसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन वर्धा नदीवरुन तेलवासा ढोरवासा व निप्पॉन डेन्रोच्या जागेवरुन गेलेली आहे. असे असतानासुद्धा या कंपनीच्या जागेचा प्रस्ताव कसा काय गेला? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे.याशिवाय या जागेबाबत संबंधित शेतकऱ्यांनी नागपूर न्यायालयातही प्रकरण न्यायप्रविष्ट केल्याची माहिती आहे. त्यामुळे या तांत्रिकबाबी तसेच इतर अडचणींमुळे निप्पॉन डेन्रो कंपनीच्या जागेचा प्रस्ताव सदोष ठरणारा असून त्यामुळे पुन्हा विमानतळ निर्मितीचा घोळ कायम राहण्याची शक्यता आहे. विमानतळासाठी राज्यमार्गाचे कमी अंतर असले पाहिजे, असाच निकष असेल तर चंदनखेडा जवळून नुकताच वरोरा- पावना- सागरा- चंदनखेडा- मुधोली- मोहर्ली ते ताडोबा- चिमूर असा राज्यमार्ग मंजूर होवून कामाच्या निविदाही निघाल्या आहेत. चंदनखेडातील नियोजित विमानतळ क्षेत्र हे या राज्यमार्गाला लागूनच आहे. तसेच येथील शेतजमीनीवर कुठलेही टॉवर किंवा जंगलही नाही. पूर्णत: प्रदूषणविरहीत असा हा परिसर आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेत चंद्रपूर-वणी- आर्णी या लोकसभा क्षेत्रातून चंदनखेडा या ग्रामपंचायतीची खासदार हंसराज अहीर यांनी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे या गावाकडे विशेष राहणार आहे. त्यांनीही विमानतळासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)